शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

“५ वर्षांत PM मोदी एकदाही संघ कार्यालयात गेले नाहीत, भाजपा-RSS संपवले”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 10:29 IST

VBA Prakash Ambedkar News: मानेवर बसलेले मोदींचे भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा RSSने आम्हाला मदत करावी, हे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

VBA Prakash Ambedkar News: मोहन भागवत यांचे नाव गेल्या सहा महिन्यात वर्तमानपत्रात ऐकले आहे का, तर नाही. अटलबिहारी वाजपेयी संघ कार्यालयात जात होते. माझ्या माहितीप्रमाणे मागच्या पाच वर्षांत नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयात गेलेले नाहीत. मोहन भागवत यांनी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे वेळ मागितली, त्यावेळेस ती वेळही दिली नाही, अशी परिस्थिती आहे, या शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी संघ संपवला. भारतीय जनता पक्षही संपवला. झेंडाही संपवला. पण निवडणुकीसाठी चिन्ह लागते, ते चिन्ह फक्त ठेवलेले आहे. अशा परिस्थितीत पक्ष टिकले, तर देशाचा एकोपा टिकतो. त्यामुळे आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे. मानेवर बसलेले मोदींचे भूत उतरवायचे का? त्यांच्या मानेवर बसलेले भूत आम्ही उतरवायला निघालो आहोत. तेव्हा संघाने त्यात आम्हाला मदत करावी, असे आवाहन संघाला केले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने भाजपासोबत मॅच फिक्सिंग केली

राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंगच्या विधानाचा अर्थ वेगळा होता. इथे राज्यातील महाराष्ट्र काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपासोबत बसून मॅच फिक्सिंग केलेले आहे. राहुल गांधी यांनी हे विसरता कामा नये. नांदेड, भंडारा-गोंदिया या मतदारसंघात काँग्रेसने मॅच फिक्सिंग केले आहे. ठाकरे गटाने कल्याण मतदारसंघातही मॅच फिक्सिंग केली आहे. शरद पवार गटाचा रावेर मतदारसंघ हाही मॅच फिक्सिंगचा आहे. आणखी लिस्ट देऊ शकतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला. या निर्णयावर बोलताना, तुम्ही भाजपाचे नाव ऐकले का, बीजेपी पार्टी संपली आहे, तिथे आता मोदी पार्टी आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिला, तो बरोबर दिला. राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला. बीजेपी पार्टीला पाठिंबा दिलेला नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली होती. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४