शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

सत्तेचा पेच ! नवनिर्वाचित आमदारांना प्रतीक्षा शपथविधीची

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 3:45 PM

आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सर्वत क्षेत्रातील कामांना खीळ बसली आहे. प्रशासकीय अधिकारी मोठे निर्णय घेऊ शकत नसल्याने कोंडी निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. तर विधानसभेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांना आपल्या शपथविधीची प्रतीक्षा लागली आहे. 

या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदार संघात बदल झाला आहे. जुन्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत मतदारांनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, कैलास पाटील, राजू नवघरे, मेघना बोर्डीकर हे पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आले आहेत. मात्र हे नेते अद्याप आमदारकीच्या अधिकारांपासून वंचित आहेत. 

राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. परंतु, आमदारकीचा शपथविधीच झाला नसल्याने अधिकारी आपल्या सूचनांना महत्त्व देतीलच याची खात्री नाही, असं या आमदारांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता जनतेचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करून ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे अपेक्षीत होते. मात्र सरकारच स्थापन झाले नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित असल्याची भावना आमदार बोलून दाखवत आहेत. 

दरम्यान आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.