शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सत्तेचा पेच ! नवनिर्वाचित आमदारांना प्रतीक्षा शपथविधीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:47 IST

आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सर्वत क्षेत्रातील कामांना खीळ बसली आहे. प्रशासकीय अधिकारी मोठे निर्णय घेऊ शकत नसल्याने कोंडी निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. तर विधानसभेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांना आपल्या शपथविधीची प्रतीक्षा लागली आहे. 

या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदार संघात बदल झाला आहे. जुन्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत मतदारांनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, कैलास पाटील, राजू नवघरे, मेघना बोर्डीकर हे पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आले आहेत. मात्र हे नेते अद्याप आमदारकीच्या अधिकारांपासून वंचित आहेत. 

राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. परंतु, आमदारकीचा शपथविधीच झाला नसल्याने अधिकारी आपल्या सूचनांना महत्त्व देतीलच याची खात्री नाही, असं या आमदारांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता जनतेचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करून ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे अपेक्षीत होते. मात्र सरकारच स्थापन झाले नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित असल्याची भावना आमदार बोलून दाखवत आहेत. 

दरम्यान आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.