शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सत्तेचा पेच ! नवनिर्वाचित आमदारांना प्रतीक्षा शपथविधीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:47 IST

आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीमुळे सर्वत क्षेत्रातील कामांना खीळ बसली आहे. प्रशासकीय अधिकारी मोठे निर्णय घेऊ शकत नसल्याने कोंडी निर्माण झाली आहे. तर शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळणे दुरापास्त झाले आहे. तर विधानसभेत पहिले पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांना आपल्या शपथविधीची प्रतीक्षा लागली आहे. 

या निवडणुकीत राज्यातील अनेक मतदार संघात बदल झाला आहे. जुन्या उमेदवारांना घरचा रस्ता दाखवत मतदारांनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी दिली आहे. मराठवाड्यात धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, नमिता मुंदडा, कैलास पाटील, राजू नवघरे, मेघना बोर्डीकर हे पहिल्यांदाच विधानसभेला निवडून आले आहेत. मात्र हे नेते अद्याप आमदारकीच्या अधिकारांपासून वंचित आहेत. 

राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार नुकसानीची पाहणी करण्यासाठी फिरत आहेत. परंतु, आमदारकीचा शपथविधीच झाला नसल्याने अधिकारी आपल्या सूचनांना महत्त्व देतीलच याची खात्री नाही, असं या आमदारांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता जनतेचे प्रश्न विधीमंडळात उपस्थित करून ते सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे अपेक्षीत होते. मात्र सरकारच स्थापन झाले नसल्यामुळे दाद मागायची तरी कोणाला असा प्रश्न उपस्थित असल्याची भावना आमदार बोलून दाखवत आहेत. 

दरम्यान आमदाराला पाच वर्षांचा कालावधी मिळतो. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने त्यातील सहा महिने काम न करता जातात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकूण नवनिर्वाचित आमदारांसह दिग्गज नेत्यांनाही राष्ट्रपती राजवटीमुळे हातावर हात ठेवून बसावे लागत आहे.