शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

राजकारण्यांनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, साहित्य संमेलनातून नितीन गडकरींचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 7:02 PM

राजकारण्यांनी इतरांच्या कामात हस्तक्षेप करता कामा नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे.

ठळक मुद्देराजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावेजेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये

 यवतमाळ -राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे, असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.  जेथे संवाद होत नाही तेते विसंवाद होतो आणि त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे मतभिन्नता असली तरी मनभिन्नता असता कामा नये, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले होते. त्यावरून राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या सरकारच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना साहित्य संमेलनात उदभवलेल्या वादासह विविध विषयांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले, ''राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण नाही. राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. दुर्दैवाने सत्ताकारणाचा अर्थ राजकारण असा झाला. राजकारण्यांनी इतरांच्या कामात अकारण ढवळाढवळ करता कामा नये. विद्यापीठ, शिक्षण, साहित्य, कविता ही ज्यांची ज्यांची क्षेत्रे आहेत त्यांनी तिथे काम करावे.''

तसेच मतभिन्ना असावी मात्र मनभिन्नता असू नये, आपल्याला विरोध करणाऱ्याचाही सन्मानच केला पाहिजे असा सल्लाही गडकरींनी दिला. ''जिथे संवाद होत नाही तिथे विसंदवाद होते, त्यातून वितंडवाद निर्माण होतो. त्यामुळे एकमेकांच्या मर्यांदा सांभाळून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मतभिन्नता असली पाहिजे. पण मनभिन्नता असता कामा नये.'' असे गडकरी म्हणाले. यावेळी गडकरींनी नयनतारा सहगल यांच्यावरही नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला. ज्यांना आपण मोठे समजतो. त्यांच्याजवळ जाऊन आल्यावर आपण समजतो तेवढे  ते मोठे नाहीत हे लक्षात येते. पण ज्यांना लहान समजतो त्यांच्या जवळ गेल्यावर ते खूप मोठे आहेत. हे लक्षात येते. वैशालीताईंना तुम्ही बोलावले हे चांगले केले. जीवनाच्या संघर्षामध्ये आत्मविश्वासाने कसे जगायचे हे दाखवून दिले आहे.'' असे गडकरींनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळPoliticsराजकारण