शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:19 IST

ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. 

मुंबई - राहुल गांधी यांची विरोधकांसोबत चर्चा झाली आहे. त्यानंतरच त्यांनी व्यासपीठावर हायड्रोजन बॉम्बबाबत भाष्य केले. व्होट चोरी हा बॉम्ब आहे. मात्र राहुल गांधी सध्या जो रिसर्च करत आहेत, त्यांच्याकडे पुराव्यासह काही माहिती आली आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल घडतील असा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. मागील काही दिवस मी म्हणतोय, पुढच्या काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हायड्रोजन बॉम्ब कारणीभूत ठरेल. नरेंद्र मोदी चीन, जपानमधील अखेरचं परदेशी पर्यटन करून घेत आहेत. परदेशात फिरणे त्यांचा छंद आहे. देशात आल्यानंतर माझ्या आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला, रडताय कशाला..कुणीही मतदार अधिकार यात्रेत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. संपूर्ण यात्रा मीदेखील पाहिली आहे. त्यांच्या आईबाबत कुठेही अपशब्द वापरले नाहीत असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू केली. बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रेचा’ सोमवारी पाटण्यात समारोप झाला. ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. 

दरम्यान, मतचोरीच्या मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेसने कामठी येथे राज्यस्तरीय निषेध मेळावा आयोजित केला होता. मतचोरीतून पुन्हा इंग्रजांपेक्षा वाईट काळात भाजपा आपल्याला नेत आहे. मतचोरीतून सरकार आणायचे, त्यानंतर नोटचोरी करून मतदारांना विकत घ्यायचे हा त्यांचा प्रकार आहे. पैसा फेक तमाशा देख हा खेळ भाजपा करत आहे. देशात सध्या मुदतपूर्व निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ७५ वर्ष झाल्यानंतर रेशीमबागच्या बाबाने दिल्लीच्या बाबाला खुर्ची खाली करण्यास सांगितली आहे. त्यात राहुल गांधींनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या सत्तेची खुर्ची डगमगू लागली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि आता तो दिवस दूर नाही की, देशात मध्यवर्ती निवडणूक लागतील आणि नवीन सरकार येणार आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ