शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
4
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
5
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
6
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
7
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
8
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
9
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
10
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
11
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
12
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
13
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
14
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
15
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
16
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
17
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
18
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
19
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
20
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा

येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 18:19 IST

ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. 

मुंबई - राहुल गांधी यांची विरोधकांसोबत चर्चा झाली आहे. त्यानंतरच त्यांनी व्यासपीठावर हायड्रोजन बॉम्बबाबत भाष्य केले. व्होट चोरी हा बॉम्ब आहे. मात्र राहुल गांधी सध्या जो रिसर्च करत आहेत, त्यांच्याकडे पुराव्यासह काही माहिती आली आहे. त्यामुळेच येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल घडतील असा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, राहुल गांधी पुराव्याशिवाय बोलत नाही. मागील काही दिवस मी म्हणतोय, पुढच्या काही महिन्यात देशात राजकीय परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तनाला हायड्रोजन बॉम्ब कारणीभूत ठरेल. नरेंद्र मोदी चीन, जपानमधील अखेरचं परदेशी पर्यटन करून घेत आहेत. परदेशात फिरणे त्यांचा छंद आहे. देशात आल्यानंतर माझ्या आईला शिव्या घातल्या म्हणून रडू लागले. देशाच्या प्रश्नावर बोला, रडताय कशाला..कुणीही मतदार अधिकार यात्रेत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरलेला नाही. संपूर्ण यात्रा मीदेखील पाहिली आहे. त्यांच्या आईबाबत कुठेही अपशब्द वापरले नाहीत असं त्यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते राहुल गांधी?

मतचोरीच्या मुद्द्यावर आक्रमक असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी १७ ऑगस्टपासून बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू केली. बिहारमधील ‘मतदार अधिकार यात्रेचा’ सोमवारी पाटण्यात समारोप झाला. ही यात्रा म्हणजे ॲटम बॉम्ब होती. आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ फुटेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला होता. 

दरम्यान, मतचोरीच्या मुद्दा घेऊन महाराष्ट्र काँग्रेसने कामठी येथे राज्यस्तरीय निषेध मेळावा आयोजित केला होता. मतचोरीतून पुन्हा इंग्रजांपेक्षा वाईट काळात भाजपा आपल्याला नेत आहे. मतचोरीतून सरकार आणायचे, त्यानंतर नोटचोरी करून मतदारांना विकत घ्यायचे हा त्यांचा प्रकार आहे. पैसा फेक तमाशा देख हा खेळ भाजपा करत आहे. देशात सध्या मुदतपूर्व निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. ७५ वर्ष झाल्यानंतर रेशीमबागच्या बाबाने दिल्लीच्या बाबाला खुर्ची खाली करण्यास सांगितली आहे. त्यात राहुल गांधींनी इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला आहे. त्यामुळे मोदींच्या सत्तेची खुर्ची डगमगू लागली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि आता तो दिवस दूर नाही की, देशात मध्यवर्ती निवडणूक लागतील आणि नवीन सरकार येणार आहे असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसSanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ