शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मनाई आदेश लागू; वन परिसरातील थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:22 IST

मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी मनाई आदेश लागू केला असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ते सकाळ दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी मनाई आदेश लागू केला असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ते सकाळ दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे . थर्टी फस्टच्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषणासह कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन रोखण्याचे आव्हान पोलिसां समोर असून विशेषतः वन परिसरातील पार्ट्याना पोलिसांनी लगाम घालण्याची मागणी होत आहे .  

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी कलम हा १४४ नुसार मनाई आदेश लागू केले आहेत . मनाई आदेशासह ओमायक्रोन व्हेरियंट मुळे कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरू लागल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .  सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजे पर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे .  बंदीस्त जागेच्या ठिकाणी आयोजित विवाह समारंभास जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळया जागेच्या ठिकाणी २५० लोक तसेच एकूण मर्यादेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा संख्या कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहु शकतील. सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम किंवा मेळाव्यात बंदीस्त सभागृहात जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळ्या जागेच्या ठिकाणी २५० लोक किंवा उपस्थिती क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्याच लोकांना परवानगी असेल .  

क्रिडा कार्यक्रम व स्पर्धांकरिता आसन क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही .  इतर कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसेल तसेच खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसेल.  तर उपहारगृहे, स्पा, चित्रपट व नाटयगृहे, व्यायामशाळा या आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उपहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आदेशात म्हटले आहे . जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने कोराना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला असून अमेरिका, युरोप सह जगातील अनेक देशां मध्ये पसरला असल्याने पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा उपायुक्तांनी दिला आहे . 

दरम्यान शहरातील मोठ्या प्रमाणात संरक्षित असलेल्या कांदळवन क्षेत्र व परिसर तसेच काजूपाडा , चेणे, वरसावे व घोडबंदर परिसरातील वन हद्दी लगतच्या इको सेन्सेटिव्ह झोन आणि उत्तन पाली , चौक , डोंगरी ह्या हरित पट्ट्यातील चालणाऱ्या पार्ट्याना वेसण घालण्याची मागणी होत आहे . ह्या भागात वन्य पशु - पक्षींचा वावर असल्याने या ठिकाणी अश्या कार्यक्रमां सह ध्वनी क्षेपक, लेझर लाईट, फटाके फोडणे आदींना परवानगी न देण्याची मागणी पर्यावरणासाठी कार्य करणारे सचिन जांभळे, रुपाली श्रीवास्तव सह जागरूक नागरिकांनी केली आहे .  ह्या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश बजावावेत जेणे करून या ठिकाणी होणारे उल्लंघन रोखता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिस