शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मीरा भाईंदरमध्ये पोलिसांचा मनाई आदेश लागू; वन परिसरातील थर्टी फस्टच्या पार्ट्यांवर कारवाईची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 15:22 IST

मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी मनाई आदेश लागू केला असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ते सकाळ दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी मनाई आदेश लागू केला असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ते सकाळ दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे . थर्टी फस्टच्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषणासह कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन रोखण्याचे आव्हान पोलिसां समोर असून विशेषतः वन परिसरातील पार्ट्याना पोलिसांनी लगाम घालण्याची मागणी होत आहे .  

मीरा भाईंदर महापालिका हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी कलम हा १४४ नुसार मनाई आदेश लागू केले आहेत . मनाई आदेशासह ओमायक्रोन व्हेरियंट मुळे कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरू लागल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे .  सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजे पर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे .  बंदीस्त जागेच्या ठिकाणी आयोजित विवाह समारंभास जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळया जागेच्या ठिकाणी २५० लोक तसेच एकूण मर्यादेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा संख्या कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहु शकतील. सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम किंवा मेळाव्यात बंदीस्त सभागृहात जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळ्या जागेच्या ठिकाणी २५० लोक किंवा उपस्थिती क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्याच लोकांना परवानगी असेल .  

क्रिडा कार्यक्रम व स्पर्धांकरिता आसन क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही .  इतर कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसेल तसेच खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसेल.  तर उपहारगृहे, स्पा, चित्रपट व नाटयगृहे, व्यायामशाळा या आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उपहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आदेशात म्हटले आहे . जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने कोराना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला असून अमेरिका, युरोप सह जगातील अनेक देशां मध्ये पसरला असल्याने पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा उपायुक्तांनी दिला आहे . 

दरम्यान शहरातील मोठ्या प्रमाणात संरक्षित असलेल्या कांदळवन क्षेत्र व परिसर तसेच काजूपाडा , चेणे, वरसावे व घोडबंदर परिसरातील वन हद्दी लगतच्या इको सेन्सेटिव्ह झोन आणि उत्तन पाली , चौक , डोंगरी ह्या हरित पट्ट्यातील चालणाऱ्या पार्ट्याना वेसण घालण्याची मागणी होत आहे . ह्या भागात वन्य पशु - पक्षींचा वावर असल्याने या ठिकाणी अश्या कार्यक्रमां सह ध्वनी क्षेपक, लेझर लाईट, फटाके फोडणे आदींना परवानगी न देण्याची मागणी पर्यावरणासाठी कार्य करणारे सचिन जांभळे, रुपाली श्रीवास्तव सह जागरूक नागरिकांनी केली आहे .  ह्या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश बजावावेत जेणे करून या ठिकाणी होणारे उल्लंघन रोखता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिस