शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 22:43 IST

सत्ताकारणाचा पोलिसांना फटका..

पुणे : राज्यात सरकार स्थापनेवरुन भाजपा आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत़. याचबरोबर येत्या १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद असल्याने या पार्श्वभूमी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेत कोणतीही बाधा येऊन नये, यासाठी सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत़. या संबंधितचे आदेश पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून आज रात्री सर्व पोलीस अधीक्षक, घटकप्रमुखांना देण्यात आले आहे़. सध्या सरकार स्थापन करण्यावरुन दररोज उलटसुलट बातम्या येत असून राज्यातील राजकीय वातावरण विशेषत: शिवसेना आणि भाजपामध्ये तणाव निर्माण झाला आहे़. भाजपाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण दिल्यास राज्यात त्याविरोधात पडसाद उमटू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे़. कोणाचेही सरकार सत्तारुढ झाले तरी त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे़. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी सर्वांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत़. मुंबईत शनिवारी राज्यातील सर्व अति वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला़. पोलीस अधीक्षक आणि घटक प्रमुखांनी बैठक आयोजित करण्यात आली होती़. या बैठकीत पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या रजा रद्द कराव्यात असे सांगण्यात आल्याचे समजते़. या बैठकीनंतर रात्री उशिरा पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून रजा, सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश पाठविण्यात आले आहे़. १० नोव्हेंबरला ईद ए मिलाद हा सण असल्याने सुट्ट्या रद्द कराव्यात असे कारण त्यासाठी देण्यात आले आहे़. याबरोबरच पुढील आठवड्यात अयोध्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने यावेळीही राज्यभरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. त्यामुळे अयोध्येचा निकाल लागून राज्यातील परिस्थिती शांत राहीपर्यंत पोलिसांच्या रजा, सुट्ट्या रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे़. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण