शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
2
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
3
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
4
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
5
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
6
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
7
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
8
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
9
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
10
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
11
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
12
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
13
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
14
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
15
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
16
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
17
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
18
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
19
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
20
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:19 IST

"एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त अन् दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे गुणगान गाणारे..."

PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेतून पीएम मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडण्यासाठीची निवडणूक नाही, या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत, तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान करणारे आहेत," असा घणाघात मोदींनी केला.

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली"औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते, पण काँग्रेसच्या दबावाखाली या लोकांची नाव बदलण्याची हिंमत झाली नाही. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली," असा हल्लाबोल मोदींनी केला.

नामकरणाविरोधात हे लोक न्यायालयात गेले मोदी पुढे म्हणाले, "मी एकनाथ शिंदे सरकारला धन्यवाद देतो की, त्यांनी शहराचे नामकरण केले. संभाजीनगरची भूमी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारी भूमी आहे. याच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर काँग्रेस आणि आघाडीला दणका बसला. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांचे नेते न्यायालयात गेले. या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्यांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत." 

महायुती सरकारने मराठवाड्यात पाणी आणले"विठ्ठलाच्या भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे. आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या समस्या वाढवण्याशिवाय काहीही केले नाही. मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पाण्याचे संकट आहे, पण काँग्रेस आणि आघाडीचे लोक नेहमीच निष्क्रिय राहिले. महाविकास आघडीवाले पाण्याच्या थेंबा-थेंबसाठी अडचणी आणल्या. आपल्या सरकारमध्ये पहिल्यांदाच दुष्काळाविरुद्ध ठोस प्रयत्न सुरू झाले. वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामुळे जल स्थर वाढला होता. पण मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकाने पाणी योजना रोखल्या, जळ्युक्त शिवाराची योजना थांबवली," अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडीपीएम मोदी यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसला वाटत होते की, ओबीसी आपापल्या जातींमध्ये विभागले जातील आणि या वर्गाची ताकद कमी होईल. या विचारानेच काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा विचार करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करेल. काँग्रेसचे राजकुमार परदेशात उघडपणे आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगतात. काँग्रेस आणि आघाडी एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचा अजेंडा आजही तोच आहे त्यामुळे गेली 10 वर्षे ओबीसी समाजाचे पंतप्रधान होणे त्यांना सहन होत नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना