शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 17:19 IST

"एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त अन् दुसऱ्या बाजूला औरंगजेबाचे गुणगान गाणारे..."

PM Narendra Modi in Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेतून पीएम मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेससह विरोधकांवर जोरदार टीका केली. "महाराष्ट्रातील ही निवडणूक केवळ नवीन सरकार निवडण्यासाठीची निवडणूक नाही, या निवडणुकीत एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांना मानणारे देशभक्त आहेत, तर दुसरीकडे औरंगजेबाचे गुणगान करणारे आहेत," असा घणाघात मोदींनी केला.

बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली"औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी सर्वप्रथम दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते, पण काँग्रेसच्या दबावाखाली या लोकांची नाव बदलण्याची हिंमत झाली नाही. महायुतीचे सरकार सत्तेवर येताच शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली," असा हल्लाबोल मोदींनी केला.

नामकरणाविरोधात हे लोक न्यायालयात गेले मोदी पुढे म्हणाले, "मी एकनाथ शिंदे सरकारला धन्यवाद देतो की, त्यांनी शहराचे नामकरण केले. संभाजीनगरची भूमी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगणारी भूमी आहे. याच औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर काँग्रेस आणि आघाडीला दणका बसला. त्यामुळेच हा निर्णय रद्द करण्यासाठी त्यांचे नेते न्यायालयात गेले. या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांना मारणाऱ्यांमध्ये आदर्श दिसतो. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात आहेत." 

महायुती सरकारने मराठवाड्यात पाणी आणले"विठ्ठलाच्या भक्तांच्या सोयीसाठी आम्ही पालखी महामार्ग तयार केला आहे. आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या समस्या वाढवण्याशिवाय काहीही केले नाही. मराठवाड्यात अनेक दिवसांपासून पाण्याचे संकट आहे, पण काँग्रेस आणि आघाडीचे लोक नेहमीच निष्क्रिय राहिले. महाविकास आघडीवाले पाण्याच्या थेंबा-थेंबसाठी अडचणी आणल्या. आपल्या सरकारमध्ये पहिल्यांदाच दुष्काळाविरुद्ध ठोस प्रयत्न सुरू झाले. वैतरणा आणि उल्हास खोऱ्यातून मराठवाड्याला पाणी दिले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यामुळे जल स्थर वाढला होता. पण मधल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकाने पाणी योजना रोखल्या, जळ्युक्त शिवाराची योजना थांबवली," अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची कोंडीपीएम मोदी यांनी यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसला वाटत होते की, ओबीसी आपापल्या जातींमध्ये विभागले जातील आणि या वर्गाची ताकद कमी होईल. या विचारानेच काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्याचा विचार करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण बंद करेल. काँग्रेसचे राजकुमार परदेशात उघडपणे आरक्षण रद्द करणार असल्याचे सांगतात. काँग्रेस आणि आघाडी एससी, एसटी आणि ओबीसीमध्ये फूट पाडण्याचा कट रचत आहे. काँग्रेसचा अजेंडा आजही तोच आहे त्यामुळे गेली 10 वर्षे ओबीसी समाजाचे पंतप्रधान होणे त्यांना सहन होत नाही," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना