शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:27 IST

'या संविधानात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे.'

Rahul Gandhi in Nandurbar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींन संविधान, आरक्षण आणि आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ही निवडणूक दोन महत्त्वाच्या विचारधारांची लढाई आहे. राज्यघटनेने देश चालवा, असे काँग्रेस-आघाडीचे म्हणणे आहे, तर पीएम मोदी अन् भाजपवाले या संविधानाला कोरे/रिकामे म्हणतात,' अशी टीका राहुल यांनी केली.

यावेळी राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, हे संविधान कोरे नाही, यात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे. नरेंद्र मोदींनी संविधान कधी वाचलेच नाही, त्यामुळे त्यांना हे कोरे दिसते, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

रंगाने काय फरक पडतो?राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे संविधान हातात घेऊन फिरतात, त्यावरुन झालेल्या टीकेवर राहुल यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, मी नेहमी लाल रंगाचे संविधान दाखवतो. पण मी म्हणतो की, संविधानाच्या रंगापेक्षा, त्यात काय लिहिले आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. कव्हरच्या रंगाने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यामध्ये काय लिहिले आहे, त्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत, हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

'आदिवासी म्हणजे वनवासी नाही'काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी जे संविधान रॅलीमध्ये दाखवतो, ते कोरे नाही. त्यात बिरसा मुंडा, शाहू, फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध, गांधीजींचे विचार आहेत. या संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. त्यात सर्वसामान्यांचा आवाज आहे. आदिवासी म्हणजे भारतातील पहिले रहिवासी, त्यांचा जल, जंगल आणि जमीनीवर हक्क आहे. त्यासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी लढा दिला. संविधानात आदिवासी हा शब्द लिहिलेला आहे, पण भाजप-आरएसएसचे लोक त्याला वनवासी म्हणतात, आदिवासी नाही. आदिवासी आणि वनवासी यांच्यात मोठा फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

जात जनगणनेसाठी आवाज उठवलायावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व योजनांमध्ये त्यांचा किती सहभाग आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, देशाच्या संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, पण त्यांचा सहभाग किती? जात जनगणना झाल्यावर हे कळेल, असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार येथील प्रकल्प इतर राज्यात पाठवते, त्यामुळे येथील लोकांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागते. हे सर्व जोडले तर महाराष्ट्र सरकारने सुमारे 5 लाख नोकऱ्या हिसकावून घेतल्याचेही टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnandurbar-pcनंदुरबारcongressकाँग्रेसBJPभाजपा