शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:27 IST

'या संविधानात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे.'

Rahul Gandhi in Nandurbar : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज नंदुरबारमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधींन संविधान, आरक्षण आणि आदिवासींचा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ही निवडणूक दोन महत्त्वाच्या विचारधारांची लढाई आहे. राज्यघटनेने देश चालवा, असे काँग्रेस-आघाडीचे म्हणणे आहे, तर पीएम मोदी अन् भाजपवाले या संविधानाला कोरे/रिकामे म्हणतात,' अशी टीका राहुल यांनी केली.

यावेळी राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, हे संविधान कोरे नाही, यात गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासींचा आवाज आहे. नरेंद्र मोदींनी संविधान कधी वाचलेच नाही, त्यामुळे त्यांना हे कोरे दिसते, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

रंगाने काय फरक पडतो?राहुल गांधी नेहमी लाल रंगाचे संविधान हातात घेऊन फिरतात, त्यावरुन झालेल्या टीकेवर राहुल यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, भाजपवाले म्हणतात की, मी नेहमी लाल रंगाचे संविधान दाखवतो. पण मी म्हणतो की, संविधानाच्या रंगापेक्षा, त्यात काय लिहिले आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. कव्हरच्या रंगाने आम्हाला काही फरक पडत नाही, पण त्यामध्ये काय लिहिले आहे, त्याच्या रक्षणासाठी आम्ही प्राणाची आहुती देण्यास तयार आहोत, हे आमच्यासाठी महत्वाचे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

'आदिवासी म्हणजे वनवासी नाही'काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, मी जे संविधान रॅलीमध्ये दाखवतो, ते कोरे नाही. त्यात बिरसा मुंडा, शाहू, फुले, आंबेडकर, भगवान बुद्ध, गांधीजींचे विचार आहेत. या संविधानात भारताचे ज्ञान, देशाचा आत्मा आहे. त्यात सर्वसामान्यांचा आवाज आहे. आदिवासी म्हणजे भारतातील पहिले रहिवासी, त्यांचा जल, जंगल आणि जमीनीवर हक्क आहे. त्यासाठी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांशी लढा दिला. संविधानात आदिवासी हा शब्द लिहिलेला आहे, पण भाजप-आरएसएसचे लोक त्याला वनवासी म्हणतात, आदिवासी नाही. आदिवासी आणि वनवासी यांच्यात मोठा फरक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

जात जनगणनेसाठी आवाज उठवलायावेळी राहुल गांधींनी पुन्हा एकदा जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला. आदिवासींच्या कल्याणासाठी केलेल्या सर्व योजनांमध्ये त्यांचा किती सहभाग आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, देशाच्या संपत्तीवर आदिवासींचा हक्क आहे, पण त्यांचा सहभाग किती? जात जनगणना झाल्यावर हे कळेल, असे राहुल म्हणाले. यादरम्यान राहुल गांधींनी महाराष्ट्र सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार येथील प्रकल्प इतर राज्यात पाठवते, त्यामुळे येथील लोकांना नोकरीसाठी इतर राज्यात जावे लागते. हे सर्व जोडले तर महाराष्ट्र सरकारने सुमारे 5 लाख नोकऱ्या हिसकावून घेतल्याचेही टीकाही त्यांनी केली.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnandurbar-pcनंदुरबारcongressकाँग्रेसBJPभाजपा