शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 17:59 IST

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत अनेक वर्षापासून मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही भूमिका घेत विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागल्याने भाजपा नेते राज्यात नव्या मित्रपक्षाच्या शोधात असल्याचं दिसून येतं. 

याचाच प्रत्यय पालघरमधील वाडा पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ७ जानेवारी याठिकाणी मतदान होणार आहे. वाडा पंचायत निवडणुकीच्या भाजपा उमेदवाराने बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो लावल्याने भाजपा-मनसे यांच्यात राज्यात जवळीक वाढणार का? हे पाहणे गरजेचे आहे. 

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शपथ घेतली. राज्यातील सत्तांतराचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. जिल्हा परिषद अध्यक्ष, महानगरपालिका महापौर निवडणुकीत स्थानिक आघाड्या स्थापन झाल्या. मात्र या सर्व घडामोडी नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपाला मदत केली तसेच केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळीही भाजपा उमेदवाराला मनसेची साथ मिळाली. 

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या २३ जानेवारीला काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. २३ जानेवारी रोजी मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होणार असून यापुढे मनसेची दिशा काय असेल ते स्पष्ट होईल. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात कडवी भूमिका घेतली होती. पण राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे कट्टर विरोधक एकत्र येत असतील तर राजकारणात काहीही होऊ शकतं याची प्रचिती सर्वांनाच आली आहे.  

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेNarendra Ghuleनरेंद्र घुले