शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
3
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
5
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
6
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
7
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
8
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
9
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
10
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
11
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
12
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
13
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
14
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
15
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
16
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
17
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
18
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
19
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
20
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?

एकाच बॅनरवर झळकले नरेंद्र मोदी-राज ठाकरेंचे फोटो; भाजपा-मनसे नव्या मैत्रीचा अध्याय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 17:59 IST

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे.

मुंबई - राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यमय घडामोडीत अनेक वर्षापासून मित्रपक्ष असलेले शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाला. मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेनेने आग्रही भूमिका घेत विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. त्यामुळे भाजपा सत्तेपासून दूर राहिली. शिवसेनेने दिलेला धक्का भाजपाच्या जिव्हारी लागल्याने भाजपा नेते राज्यात नव्या मित्रपक्षाच्या शोधात असल्याचं दिसून येतं. 

याचाच प्रत्यय पालघरमधील वाडा पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी दिसून येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. पालघरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ७ जानेवारी याठिकाणी मतदान होणार आहे. वाडा पंचायत निवडणुकीच्या भाजपा उमेदवाराने बॅनरवर राज ठाकरेंचे फोटो लावल्याने भाजपा-मनसे यांच्यात राज्यात जवळीक वाढणार का? हे पाहणे गरजेचे आहे. 

राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जवळीक साधत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी शपथ घेतली. राज्यातील सत्तांतराचे पडसाद स्थानिक पातळीवरही उमटल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. जिल्हा परिषद अध्यक्ष, महानगरपालिका महापौर निवडणुकीत स्थानिक आघाड्या स्थापन झाल्या. मात्र या सर्व घडामोडी नाशिक महानगरपालिकेत मनसेने भाजपाला मदत केली तसेच केडीएमसीच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळीही भाजपा उमेदवाराला मनसेची साथ मिळाली. 

शिवसेना-भाजपा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने मनसे भाजपा एकमेकांच्या जवळ येत असल्याचं यातून स्पष्ट होत असलं तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या २३ जानेवारीला काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. २३ जानेवारी रोजी मुंबईत मनसेचं महाअधिवेशन होणार असून यापुढे मनसेची दिशा काय असेल ते स्पष्ट होईल. लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात कडवी भूमिका घेतली होती. पण राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी हे कट्टर विरोधक एकत्र येत असतील तर राजकारणात काहीही होऊ शकतं याची प्रचिती सर्वांनाच आली आहे.  

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेNarendra Ghuleनरेंद्र घुले