शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:17 IST

'संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते'

पोपट पवार

कोल्हापूर : कर्नाटकात यश मिळाले किंवा केंद्रात एनडीएची पीछेहाट झाली की ईव्हीएम चांगले अन् महाराष्ट्रातील निकाल लागले की भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे. लोकांना इंडिया आघाडीची ही गोष्ट समजली आहे. त्यांचे खोटे नरेटिव्ह आता कळून चुकले आहे, त्यामुळे विधानसभेला त्यांनी ही चुक दुरुस्त केली, या शब्दांत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचे दिल्ली विधानसभा निकालावरुन स्पष्ट झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत थोडी गडबड झाली, मात्र, लोकांना खोटा नरेटिव्ह पसरवले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विधानसभेत ही चूक दुरुस्त केली. हरियाना, महाराष्ट्र व दिल्लीतही यश मिळाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा संपला नाही, संपणार नाही.संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असतेदिल्लीत काँग्रेस-आप एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता या संजय राऊत यांच्या विधानाचाही मंत्री पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेस-आपला एकत्र यायला कुणी अडवले होते का?, संजय राऊत महान नेते आहेत, ते या दोघांमधील समझोता करु शकले असते असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला पाठिंबा न देता शिवसेनेने आपला पाठिंबा दिला येथेच मोठी ठिणगी पडली. त्यामुळे इतरांनी आघाडीतून बाहेर जाण्यापेक्षा काँग्रेसच आघाडीतून बाहेर पडते की काय अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.राऊत यांनी जादूची कांडी फिरवावीसंजय राऊत यांना जादूच्या कांडीने अशा प्रकारे चांगले निकाल लागू शकतात असे वाटत असेल तर त्यांनी रोज सकाळी पत्रकारांशी बोलण्यापेक्षा साधना करावी अन जादूची कांडी फिरवावी असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला...म्हणून आरडाओरडा नको"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा २ कोटी ४२ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मग, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचे की अर्धा भरलेला आहे, असे म्हणायचे? कार असलेले, इन्कम टॅक्स भरलेला किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेल्या ५ लाख महिलांना वगळण्यात आले. यामध्ये इतके आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही, तशी कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसAAPआपladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा