शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

इंडिया आघाडीचे खोटे नरेटिव्ह लोकांना कळून चुकले - मंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:17 IST

'संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असते'

पोपट पवार

कोल्हापूर : कर्नाटकात यश मिळाले किंवा केंद्रात एनडीएची पीछेहाट झाली की ईव्हीएम चांगले अन् महाराष्ट्रातील निकाल लागले की भ्रष्टाचार झाला असे म्हणायचे. लोकांना इंडिया आघाडीची ही गोष्ट समजली आहे. त्यांचे खोटे नरेटिव्ह आता कळून चुकले आहे, त्यामुळे विधानसभेला त्यांनी ही चुक दुरुस्त केली, या शब्दांत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात इंडिया आघाडीवर टीकास्त्र सोडले. शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्गाच्या उद्घाटनानंतर मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, सामान्य माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास वाढला असल्याचे दिल्ली विधानसभा निकालावरुन स्पष्ट झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत थोडी गडबड झाली, मात्र, लोकांना खोटा नरेटिव्ह पसरवले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विधानसभेत ही चूक दुरुस्त केली. हरियाना, महाराष्ट्र व दिल्लीतही यश मिळाले. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा संपला नाही, संपणार नाही.संजय राऊत महान नेते, ते समझोता करु शकले असतेदिल्लीत काँग्रेस-आप एकत्र आले असते तर निकाल वेगळा असता या संजय राऊत यांच्या विधानाचाही मंत्री पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेस-आपला एकत्र यायला कुणी अडवले होते का?, संजय राऊत महान नेते आहेत, ते या दोघांमधील समझोता करु शकले असते असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. काँग्रेसला पाठिंबा न देता शिवसेनेने आपला पाठिंबा दिला येथेच मोठी ठिणगी पडली. त्यामुळे इतरांनी आघाडीतून बाहेर जाण्यापेक्षा काँग्रेसच आघाडीतून बाहेर पडते की काय अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.राऊत यांनी जादूची कांडी फिरवावीसंजय राऊत यांना जादूच्या कांडीने अशा प्रकारे चांगले निकाल लागू शकतात असे वाटत असेल तर त्यांनी रोज सकाळी पत्रकारांशी बोलण्यापेक्षा साधना करावी अन जादूची कांडी फिरवावी असा टोलाही मंत्री पाटील यांनी लगावला...म्हणून आरडाओरडा नको"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा २ कोटी ४२ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. मग, ग्लास अर्धा रिकामा आहे म्हणायचे की अर्धा भरलेला आहे, असे म्हणायचे? कार असलेले, इन्कम टॅक्स भरलेला किंवा एका घरात अनेक महिलांनी लाभ घेतलेल्या ५ लाख महिलांना वगळण्यात आले. यामध्ये इतके आरडाओरडा करण्याची गरज नाही. गेलेले पैसे पुन्हा घेणार नाही, तशी कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025BJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसAAPआपladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचा