शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

व्याज भरा, नाहीतर नवीन कर्ज नाही; शेतकरी पुन्हा संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 06:50 IST

राज्यभरातील जिल्हा बँकांची भूमिका

- स. सो. खंडाळकर औरंगाबाद : उद्धव ठाकरे सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी सुरू असतानाच कोरोना महामारीचे संकट आले. आधीच हे गंभीर संकट असताना औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यभरातील जिल्हा बँकांनी व्याज भरल्याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज द्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याने शेतकºयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम उशिरा मिळाली. त्या रकमेच्या व्याजासाठी शेतकºयांची अडवणूक होत आहे.शासनाचे अवर सचिव व सहनिबंधक रमेश शिंगटे यांच्या २२ मेच्या पत्रानुसार खरीप हंगाम २०२० साठी शेतकºयांना नवीन पीककर्ज द्यावे असे म्हटले आहे. व्याज आम्ही भरू, अशी शासनाची भूमिका आहे. व्याज वसुली शेतकºयांकडून करू नये, असे पत्र सहकार आयुक्तांनी बँकांना दिले आहे. जिल्हा उपनिबंधकांनीसुद्धा शेतकºयांकडून व्याज वसुली न करण्याबाबत बँकेला पत्रे पाठविलेली आहेत. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील व कार्यकारी संचालक शिंदे यांनी सांगितले की, व्याज आकारणीबद्दल आम्हाला सरकारकडून स्पष्ट सूचना नाहीत.पाच महिने रक्कम उशिरा वर्ग३० मे २०२० पर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना झाला. कोरोनामुळे ही रक्कम बँकेच्या खात्यात वर्ग करण्यास पाच महिने उशीर झाला. त्यामुळे जिल्हा बँका व इतर बँकांनी या सहा महिन्यांचे व्याज शेतकºयांकडूनच वसूल करायला सुरुवात केली. व्याज दिल्याशिवाय जिल्हा बँकांच काय इतर विविध कार्यकारी सोसायट्यांकडूनही नवीन कर्ज दिले जात नाही, अशी तक्रार वाढलेली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी