शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

..पवार तरी लढलेत का पाच जिल्ह्यातून : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 10:54 IST

‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो.

ठळक मुद्दे मी पाच जिल्ह्यातून लढतो हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार

 पुणे: ‘मी कधी लोकांमधून निवडून आलेलो नाही असा आक्षेप घेणाऱ्या पवारांना माहिती नसेल, पण मी पाच जिल्ह्यांमधून निवडून येतो. त्यांनी तरी कधी पाच जिल्ह्यांमधून निवडणूक लढवली आहे का?’ असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केला. पदवीधर मतदारसंघातील मतदार उलट जास्त विचारी व हुशार असतात असे ते म्हणाले.पक्षाच्या शहर शाखेच्या वतीने प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाटील यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना पाटील यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रदर्शित केले जात आहे यावर ते म्हणाले, ‘‘राजकारणात महत्वाकांक्षा ठेवावीच लागते. ती नसेल तर माणूस एकतर सामाजिक कार्य करतो किंवा मग एखाद्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष होण्यावरच समाधान मानतो. त्यामुळे ते तसे प्रदर्शित करत असतील तर त्यात काही गैर नाही.’’भाजपाचे सगळे काही स्वबळावर असल्यासारखे सारखे चालले आहे याकडे लक्ष वेधले असता पाटील म्हणाले, ‘‘तसे काहीच नाही. आम्ही युतीचे म्हणूनच सगळे बोलत असतो. जागा वाटपाचा मुद्दा असेल तर ज्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्या तशाच ठेवणे हे कोणत्याही युतीमधील सर्वसाधारण तत्व असते. तसेच ते आहे. एखाद्या जागेबद्दल देवाणघेवाण होऊ शकतो, मात्र तो विषय वरिष्ठ स्तरावर होतो, स्थानिक स्तरावर नाही. त्यासाठी राजकीय स्थिती लक्षात घेतली जाते. पुण्यातील विधानसभेच्या सर्व जागा भाजपाकडे आहे, मात्र त्यात काय होईल ते आत्ताच सांगता येणार नाही. आम्ही काही देणार असून तर त्यांनाही काहीतरी द्यावे लागेल. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.’’काँग्रेसमुक्त राज्य करायचे असे म्हणतो त्यावेळी काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्ट कारभार, बेशिस्त या संस्कृतीपासून राज्याला मुक्त करायचे असा त्याचा अर्थ असतो असे पाटील यांनी सांगितले. काँग्रेसमधील नेत्यांना भाजपात घेऊन का असे विचारले असता पाटील म्हणाले, ‘‘भाजपात घेताना तावूनसुलाखून घेतले जाते. आम्ही विखे यांना पक्षात घेतले, भूजबळांना घेतलेले नाही. विखे यांच्यावर कसलेही आरोप नाहीत. एकूण आमदार किंवा मंत्री यामध्ये भाजपाचे प्रमाणच जास्त आहे. गेल्या ५ वर्षात बाहेरून घेतलेल्या फक्त विखे यांना मंत्री केले आहे. भाजपाचा मुळ विचार राष्ट्रीय विचार आहे. हेगडेवार, सावरकर, फुले, आंबेडकर यांना सर्वसामान्यांविषयी कणव होती, हाच भाजपाचाही विचार आहे.’’

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक