शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात विधेयके मंजूर करणे हा जनतेशी विश्वासघात : नार्वेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 05:18 IST

सभागृह आणि गोंधळ असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे काहीही करून लक्ष वेधायचे

यदु जोशीमुंबई : जनसामान्यांच्या हिताचे निर्णय विधानसभेत करतील म्हणून लोक विश्वासाने आमदारांना निवडून देतात, पण सभागृहात बरेचदा गोंधळातच विधेयके मंजूर होतात, हा जनतेचा विश्वासघातच आहे. माझ्या कारकिर्दीत एकही विधेयक गोंधळात मंजूर होणार नाही, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेवर प्रभुत्व, कायद्याचा सखोल अभ्यास आणि राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण असा संगम असलेले ॲड. नार्वेकर यांनी या मुलाखतीत संसदीय कामकाजाच्या दर्जाबाबत चिंता व्यक्त केली आणि स्वत:चे व्हिजनदेखील सांगितले.

सभागृह आणि गोंधळ असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. प्रसिद्धीमाध्यमांचे काहीही करून लक्ष वेधायचे, त्यासाठी गोंधळ घालायचा ही परिस्थिती आपल्या कार्यकाळात बदलेल की तशीच राहील? ॲड. नार्वेकर - मी विश्वास देतो की, ही परिस्थिती नक्कीच बदलेल. सभागृहाने विधेयकास मंजुरी दिल्यानंतर पुढे त्याचे कायद्यात रूपांतर होते. हे कायदेमंडळ आहे. गडबड, गोंधळात विधेयके मंजूर करवून घेण्यावर बरेचदा भर दिला जातो, मी तसे होऊ देणार नाही. एखादा कायदा करताना त्यावर सांगोपांग चर्चा झालीच पाहिजे, यावर भर असेल. सभागृहाची गौरवशाली प्रतिमा कुठेही डागाळणार नाही हे मला बघावेच लागेल. सभागृहाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होत असल्याने आमदारांचा सभागृहातील गोंधळ वाढला आहे असे नाही का वाटत? 

ॲड. नार्वेकर - पारदर्शकता ही लोकशाहीची गरज आहे. थेट प्रक्षेपण लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे, आपले आमदार काय बोलतात, कसे वागतात, हे ते बघत असतात. अशावेळी असंसदीय वर्तणूक होणार नाही याची काळजी आमदारांनी घेतलीच पाहिजे. संसदीय लोकशाहीच्या चौकटीत राहूनच आमदारांनी बोलावे, वागावे हा माझा आग्रह असेल. त्यादृष्टीने एक शिस्त आवश्यक आहेच. विधानमंडळाच्या अधिकारात न्यायपालिकांचा हस्तक्षेप हा विषय सातत्याने चर्चिला जातो. न्यायपालिकांचा असा हस्तक्षेप वाढला आहे असे वाटते का? ॲड. नार्वेकर - मी ज्या पदावर आज आहे त्यावरून मला तसे म्हणता येणार नाही. कार्यकारी मंडळ, विधानमंडळ आणि कायदेमंडळ हे लोकशाहीचे तीन स्तंभ आहेत आणि त्यांना समान स्थान आहे. त्यामुळे तिघांपैकी कोणीही दुसऱ्यावर  कुरघोडी करणे अपेक्षित नाही. तिन्हींनी आपापल्या मर्यादेत राहून काम करायला हवे.   दुसऱ्याची कार्यकक्षा ही आपल्या अधिकारात आहे, असे समजून वागणे हे संविधानाच्या तरतुदींच्या विपरीत आहे. विधानसभेच्या अध्यक्षांना फक्त उजवा कान असतो, डावा कान नसतो म्हणजे डाव्या बाजूची (विरोधकांची) ते फारशी दखल घेत नाहीत, अशी तक्रार  विरोधकांकडून नेहमीच केली जाते, आपल्याला दोन्ही कान असतील का? 

ॲड. नार्वेकर - नक्कीच मला दोन्ही कान असतील आणि दोन्ही कानांनी मला सारखेच ऐकू येईल. सर्वांना समान संधी दिली जाईल. बरेचदा ज्येष्ठांना अधिक संधी मिळते. नवीन आमदारांना सभागृहात बोलण्याची समान किंवा पुरेशी संधी मिळेल याची मी ग्वाही देतो. अध्यक्ष कामकाजाचा नार्वेकर पॅटर्न काय असेल? ॲड. नार्वेकर - विधानसभेच्या उच्च परंपरा कायम राहतील याला माझे प्राधान्य राहील. दोन्ही बाजूंच्या संवादावर माझा भर असेल. कामकाज पेपरलेस करण्यावर माझा भर असेल. नागपूरच्या विधानभवनात वर्षभर काही गतिविधी चालव्यात. त्यासाठी देशभरातील लोकप्रतिनिधींच्या प्रशिक्षणाचे ते केंद्र बनवता येईल, यादृष्टीने माझे प्रयत्न असतील.

वयाच्या ४५व्या वर्षी विधानसभा अध्यक्षपदाचा सन्मान मिळालेले ॲड. राहुल नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक तर आहेतच, शिवाय संसदीय कामकाज कसे चालावे, यासंबंधी त्यांची सुस्पष्ट मते आहेत. त्यांच्याशी केलेली ही खास बातचित...

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरEknath Shindeएकनाथ शिंदेGovernmentसरकार