शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 19:04 IST

Parivartan Mahashakti Aghadi News: संजय राऊतांनी अभ्यासपूर्ण बोलावे. देशाला आदर्शवत ठरेल, असे राज्य उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

Parivartan Mahashakti Aghadi News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. एकाबाजूला महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटपाच्या बैठकांना वेग आला असून, दुसरीकडे आरक्षणाचे मुद्दे अधिक तीव्र होताना दिसत आहेत. यातच राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ नावाने तिसरी आघाडी आकाराला येत आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रहार जनशक्तीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर देत, महाशक्तीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला आहे.

केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात, त्यांना काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांच्या मतांमध्ये कशी दुफळी माजवता येईल, यासाठी काम करतात. आतापर्यंतचा इतिहास आणि अनुभव तेच सांगतो. खरे म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत आहे. परंतु, महाविकास आघाडीची मते थोडीफार काही कमी करता आली, तर त्यासाठी नवनवीत आघाड्या स्थापन केल्या जात आहेत. त्यासाठी पदांचा आणि पैशांचा वापर करायचा, असे धोरण यातून दिसत आहे, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली होती. या टीकेचा बच्चू कडू यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. 

आम्हाला कुणाला पाठिंबा देण्याची गरजच पडणार नाही

संजय राऊतांची जहागिरी नाही. त्यांचा अभ्यास कमी पडतो. संजय राऊत यांनी अभ्यासपूर्ण बोलावे. तुम्हाला जी काही लढायची इच्छा आहे, ते तुमच्या गटातून लढावे. संजय राऊत जे बोलतायत, ते आमच्याकडून शक्य नाही. आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ. आम्हाला कुणाला पाठिंबा देण्याची गरजच पडणार नाही, असा मोठा दावा करत बच्चू कडू यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले. 

महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबुतीने दिसेल. संपूर्ण देशाला आदर्शवत ठरेल, असे राज्य उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत, सर्वांच्या समोर उमेदवार देणार. मजबुतीने देणार. आम्ही सर्व २८८ जागांवर लढणार, असे बच्चू कडू यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

दरम्यान, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे आ. बच्चू कडू, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरअण्णा धोंडगे, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, नारायण अंकुशे या नेत्यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ या आघाडीची घोषणा केली. महाशक्तीचा एकत्रित मेळावा येत्या २६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या आघाडीत मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे सामील होतील, अशी आशा या नेत्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Bacchu Kaduबच्चू कडूSanjay Rautसंजय राऊतPoliticsराजकारण