शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

भाजपाने अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या- "सध्या जे चाललंय ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 20:53 IST

Pankaja Munde Exclusive: पंकजा मुंडेंनी भाजपाच्या राजकीय भूमिकेवर मांडलं सडेतोड मत

Pankaja Munde Exclusive, Ajit Pawar BJP alliance: महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक विचित्र गोष्ट घडली. भिन्न विचारधारांचे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आले आणि त्यांच्या महाविकास आघाडीने सत्तास्थापना केली. हे सरकार अडीच वर्षे टिकले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत जाऊन सत्तास्थापना केली. राज्यातील जनता या गोष्टी पचवेपर्यंतच अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेत थेट सत्तेत उडी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदही देण्यात आले. अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाचा डाव काहींना पटला तर काहींना रूचला नाही. याचबद्दल लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला. त्यावर मुंडे यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

आशिष जाधव यांनी प्रश्न विचारला, "भाजपाने प्रचाराच्या वेळी सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा यासारख्या गोष्टींवर अजित पवार यांना टार्गेट केले होते. मग त्यांना सोबत घेताना भाजपाचा खरा मतदार दुरावेल असा विचार केला गेला नाही का? तुम्हाला हे पटलं का?" त्यांच्या प्रश्नाला पंकजा यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"मतदारांचा विचार मी करते. पण मी अजित पवार या एका व्यक्तीबद्दल म्हणणार नाही. आम्ही त्यावेळी ज्या निवडणुका लढलो त्यात एका व्यक्तीला टार्गेट केलं नव्हतं, एका विषयाला टार्गेट करून लढत होतो. भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत होतो. सध्या जे चाललंय ते राजकारण आहे. आपली शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा राजकारणातला अधिकार आहे. सत्ता असेल तर लोकांची सेवा करता येते. त्यामुळे या गोष्टींच्या माध्यमातून स्थायी आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अजितदादांना सोबत घेण्याच्या भाजपाच्या कृतीचे समर्थनच केले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार