शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
3
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
4
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
5
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
6
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
7
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
8
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
9
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
10
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
11
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
12
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
13
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
14
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
15
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
16
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
17
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
18
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
19
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
20
Dharmendra Health Update : "आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."

राज्यात काँग्रेसचे पानिपत

By admin | Updated: May 17, 2014 02:52 IST

अटकेपार झेंडा फडकावण्यास गेलेल्या सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत जसा दारुण पराभव झाला, अगदी तशीच अवस्था मोदींच्या त्सुनामीने राज्यात काँग्रेसची केली आहे.

मुंबई : अटकेपार झेंडा फडकावण्यास गेलेल्या सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा पानिपतच्या लढाईत जसा दारुण पराभव झाला, अगदी तशीच अवस्था मोदींच्या त्सुनामीने राज्यात काँग्रेसची केली आहे. काँग्रेसचे नवखे उमेदवार तर हरलेच, पण सुशीलकुमार शिंदे, गुरुदास कामत, शिवाजीराव मोघेंसारख्या अनेक दिग्गजांचाही दारुण पराभव झाला. जिथे काँग्रेस पक्षाची स्थापना झाली, त्या मुंबई शहरात तर काँग्रेस अक्षरश: भुईसपाट झाली. केवळ मराठवाड्यातील अशोक चव्हाण आणि राजीव सातव या दोघांनी पक्षाची लाज राखली. गेले दशकभर दिल्लीच्या तख्ताकडे डोळे लावून बसलेल्या शरद पवार यांच्या राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची आठ जागांवरून चार जागांवर घसरण झाली. मोदींच्या पाठिंब्यासाठी आतुरलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेसह भारिप, शेकाप, आम आदमी, बसपा, सपा, डावे या सगळ्यांना भोपळाही फोडता आला नाही. महायुतीने सर्वाधिक ४१ जागा मिळवून राज्यातील ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. विदर्भ, खान्देश, उत्तर महाराष्टÑ आणि मुंबईतील सर्वच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत. रिपाइंसाठी सोडलेल्या सातारा मतदारसंघात मात्र सेनेला अपयश आले. राज्यातील एकूण १७ विद्यमान खासदारांसह दोन खासदार पुत्रांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. काँग्रेसने २६ जागांवर ही निवडणूक लढवली. त्यापैकी केवळ नांदेडला अशोक चव्हाण व हिंगोलीला राजीव सातव यांच्या रूपाने काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे. १९६२पासूनच्या आजवरच्या सर्व निवडणुकांत काँग्रेस, राष्टÑवादीची ही राज्यातील नीचांकी कामगिरी आहे.