शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आमची कामे होत नाहीत !

By admin | Updated: June 11, 2015 01:50 IST

शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना

मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी कैफियत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यमंत्री संजय राठोड, दीपक केसरकर आणि दादा भुसे या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांची कामे होत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आली होती. आपलीच कामे होत नसतील तर सरकारमध्ये राहायचे कशाला, असा सवालही आमदारांनी केला होता. या भावनेचे पडसाद मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकतही उमटले. सूत्रांनी सांगितले की मंत्रालयातील सचिव, अन्य अधिकारी तालुक्यापर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात अन् आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. अधिकारी डोईजड होणार असतील तर त्यांना वेसण घालणे आवश्यक आहे, अशी भावना सेना मंत्र्यांनी व्यक्त केली. आमदारांचा मान राखला जाईल, त्यांच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला डावलू नये. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील ६० टक्के नियुक्त्या शिवसेनेच्या कोट्यातून व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली. या सगळ्या तक्रारी आणि महामंडळ, समित्यांवरील नियुक्त्या आदी विषयांबाबत भाजपा-शिवसेना समन्वय समितीची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)