शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

‘रिफायनरी’ला आमचा विरोधच; हिंमत असेल तर समर्थकांनी मोर्चा काढावा - नीतेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 16:36 IST

हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 

देवगड : विधानसभेत कायदा सुव्यवस्था हाती घ्यावी लागली तरी चालेल, मात्र आपण रिफायनरीला विरोध करणारच. आम्ही रिफायनरीच्या विरोधात रत्नागिरी, राजापूर, देवगड येथे मोर्चा काढले. जनतेने लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहून या रिफायनरीला आपला विरोध दाखविला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. देवगड तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी माहुल रिफायनरी व भविष्यात होणारी नाणार रिफायनरी या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक संजय तारकर, बापू जुवाटकर, उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, उष:कला केळुस्कर, प्रीती वाडेकर, शरद ठुकरुल आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, माहुल रिफायनरीमध्ये साडेचार हजार लोकांना नोक-या आहेत. मात्र त्या कंत्राटी पद्धतीवर आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीवर नोक-या मिळविण्यासाठी कोकणचे आंबे, काजू व निसर्ग यांचा बळी द्यायचा का? असा प्रश्नही राणे यांनी केला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करतात. साळगावकर हे शिवसेनेचे असून मग त्यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की शिवसेनेची अधिकृत आहे. याचा खुलासा आजतागायत झालेला नाही. यामुळे शिवसेनेची भूमिका आजतागायत संशयाची राहिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विधानसभेत कोणतेही उत्तर देण्याचे टाळतात हे त्याचेच द्योतक आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे देवगड व कणकवलीतील जनता घाबरलेली असून आपण ग्रामपंचायतींमध्ये दिलेले नाणार रिफायनरी संदर्भातील जिल्हाधिका-यांचे पत्र पाहिले  तर तुमच्या लक्षात येईल की या भागातील व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत, असेही राणे म्हणाले.

...तर विनाश अटळ आहे !नाणार येथे अशाप्रकारची घटना घडली तर अग्निशामक दलाच्या ५० गाड्या व आरोग्य सुविधा येथील जनतेला उपलब्ध होणार आहेत, त्या ख-या अर्थाने आहेत का? अशा सुविधा माहुलमध्ये किती उपलब्ध झाल्या याचाही विचार करणे गरजेचे आहे. कोकणची आरोग्य सुविधा आधीच सलाईनवर असून अशाप्रकारचा अपघात झाल्यास विनाश अटळ आहे, असे मत आमदार राणे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग