शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

‘रिफायनरी’ला आमचा विरोधच; हिंमत असेल तर समर्थकांनी मोर्चा काढावा - नीतेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 16:36 IST

हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. 

देवगड : विधानसभेत कायदा सुव्यवस्था हाती घ्यावी लागली तरी चालेल, मात्र आपण रिफायनरीला विरोध करणारच. आम्ही रिफायनरीच्या विरोधात रत्नागिरी, राजापूर, देवगड येथे मोर्चा काढले. जनतेने लाखोंच्या संख्येने या मोर्चामध्ये उपस्थित राहून या रिफायनरीला आपला विरोध दाखविला आहे. त्यामुळे हिंमत असेल तर या रिफायनरीच्या बाजूने समर्थकांनी मोर्चा काढून दाखवावा, असे खुले आव्हान आमदार नीतेश राणे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिले. देवगड तालुका स्वाभिमानच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांनी माहुल रिफायनरी व भविष्यात होणारी नाणार रिफायनरी या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेवक संजय तारकर, बापू जुवाटकर, उमेश कणेरकर, ज्ञानेश्वर खवळे, उष:कला केळुस्कर, प्रीती वाडेकर, शरद ठुकरुल आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, माहुल रिफायनरीमध्ये साडेचार हजार लोकांना नोक-या आहेत. मात्र त्या कंत्राटी पद्धतीवर आहेत. केवळ कंत्राटी पद्धतीवर नोक-या मिळविण्यासाठी कोकणचे आंबे, काजू व निसर्ग यांचा बळी द्यायचा का? असा प्रश्नही राणे यांनी केला. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे नाणार रिफायनरीचे समर्थन करतात. साळगावकर हे शिवसेनेचे असून मग त्यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की शिवसेनेची अधिकृत आहे. याचा खुलासा आजतागायत झालेला नाही. यामुळे शिवसेनेची भूमिका आजतागायत संशयाची राहिली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे विधानसभेत कोणतेही उत्तर देण्याचे टाळतात हे त्याचेच द्योतक आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे देवगड व कणकवलीतील जनता घाबरलेली असून आपण ग्रामपंचायतींमध्ये दिलेले नाणार रिफायनरी संदर्भातील जिल्हाधिका-यांचे पत्र पाहिले  तर तुमच्या लक्षात येईल की या भागातील व्यवहार थांबविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत, असेही राणे म्हणाले.

...तर विनाश अटळ आहे !नाणार येथे अशाप्रकारची घटना घडली तर अग्निशामक दलाच्या ५० गाड्या व आरोग्य सुविधा येथील जनतेला उपलब्ध होणार आहेत, त्या ख-या अर्थाने आहेत का? अशा सुविधा माहुलमध्ये किती उपलब्ध झाल्या याचाही विचार करणे गरजेचे आहे. कोकणची आरोग्य सुविधा आधीच सलाईनवर असून अशाप्रकारचा अपघात झाल्यास विनाश अटळ आहे, असे मत आमदार राणे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Ratnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग