शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
2
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
3
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
4
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
5
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
6
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
7
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
8
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
9
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
10
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
11
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
12
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
13
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
14
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
15
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
16
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
17
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
18
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
19
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
20
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचा दावा खोटा, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच मोठा पक्ष : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 18:49 IST

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे..

पिंपरी : राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीनेच सर्वाधिक जागांवर विजय मिळविला आहे. विरोधक खोटा दावा करीत आहेत. तिघे मिळून निवडणूक लढवूनही भाजपच मोठा पक्ष ठरल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केला.

भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जनजाती मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक भोसरीतील अंकुशराव लांडगे सभागृहात झाली. त्याच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महापौर उषा ढोरे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री अशोक उईके, माजी मंत्री ओमप्रकाश दुर्वे, खासदार भारती पवार, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, वैभव पिचड या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, सध्याचे सरकार तीन पक्षांचे आहे. दोन जणांसाठी असलेल्या कोचवर तिघे बसले आहेत. या तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. निवडणुकीत तिघे एकत्र आले तर काय होईल? असा प्रश्न विचारण्यात येत होते. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच ते सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळविले आहे. तिघे एकत्र येऊनही भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. विरोधक आम्हीच मोठा विजय मिळविल्याचा करीत असलेला दावा खोटा आहे.

आदिवासींनी जल, जंगल आणि जमीन संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निसर्गाचा समतोल राखण्याची संस्कृती त्यांनी उभारली. मात्र, इंग्रजांनी विरोधी कायदे करीत त्यांना उपेक्षित केले. काही जमातींना तर त्यांनी गुन्हेगार ठरविले. त्याविरोधात बिरसा मुंडा या युवकाने संघर्ष उभा केला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. म्हणून मुंडा यांचा जन्मदिवस आदिवासी दिवस म्हणून जाहीर करावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

-----

सध्याचे सरकार मालखाऊआमच्या सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कल्याणकारी योजना बंद करण्याचा घाट सध्याचे सरकार घालत आहेत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आम्ही पैसे जमा करीत होतो. मात्र, सध्याच्या सरकारला खरेदीचा शौक आहे. कारण माल खरेदी केल्यास त्यांना माल मिळतो अशी कडवट टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याणकारी योजना बंद करणारे तुम्ही कोण, असा जाब सरकारला विचारणार आहे. त्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागला तरी चालेल, अशी पुष्टी फडणवीस यांनी जोडली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस