शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
2
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
3
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
4
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
7
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
8
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
9
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
10
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
11
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
12
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
14
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
15
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
16
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
17
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
18
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
19
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
20
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा

विरोधकांचा युतीवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 6:10 AM

चहापानावर बहिष्कार; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांची केलेली फसवणूक आणि लोकहिताचे निर्णन न घेता केवळ घोषणाबाजी करण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या नेत्यांची रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली. बैठकीस अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, धनंजय पाटील, जयंत पाटील, गणपतराव देशमुख, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. विखे-पाटील म्हणाले की, आता शेतकºयांमधील असंतोष कमी करण्यासाठी सहा हजारांच्या अनुदानाची घोषणा केली. सरसकट कर्जमाफीची मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी २८ मार्च २०१८ ला ७२ हजार जागा भरणार असल्याची घोषणा केली. पण वर्षानंतरही यातले काही झाले नाही. आता, आचारसंहितेच्या तोंडावर जाहिराती काढून तरुण बेरोजगारांना गाजर दाखविण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने सरकारने या अर्थसंकल्पात इतर तरतुदी करू नयेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याचे मान्य करत युतीची घोषणा केली गेली. मग अधिसूचना रद्द करण्याची फाईल मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये आहे, त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला.भाजपा-शिवसेना ‘बॅड बॉईज’भाजपा-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी टीका विखे-पाटील यांनी केली.