शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अवघ्या आठवड्याभरात वादात अडकले शिवसेनेचे मंत्री; डिग्री बोगस असल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 12:48 IST

ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या डिग्रीमुळे उच्च तंत्र शिक्षण मंत्री अडकले वादात

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत वादात सापडले आहेत. सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. फडणवीस सरकारमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडेदेखील डिग्रीमुळे वादात सापडले होते. विशेष म्हणजे या दोन्ही आजी-माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या डिग्री ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या आहेत. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी सामंत यांच्या डिग्रीबद्दलची माहिती मिळवली. त्यानंतर विरोधकांनी सामंत यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं. ‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. ‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठाची स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जायचं. त्याची डिग्री दिली जायची, तशी मी घेतली. उद्योजक होण्यासाठी मी डिग्री घेतली होती. त्या डिग्रीच्या आधारे मी शासकीय नोकरी किंवा घर घेतलं नाही. त्या डिग्रीचा वापर करुन मी कोणताही शासकीय लाभ घेतला नाही’, असा दावा त्यांनी केला. मी मंत्री झाल्यावर अचानक हे प्रकरण चर्चेत आलं. माझ्या डिग्रीचा वाद उकरुन एखाद्याला रात्री गोळ्या न घेता शांतपणे झोप येत असेल, तर चांगलं आहे, असा टोलादेखील त्यांनी लगावला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेUday Samantउदय सामंतVinod Tawdeविनोद तावडेShiv Senaशिवसेना