शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:43 IST

आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

पुणे : आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

     महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे आर्यभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संचालक मंडळाचे अंकुश काकडे, उपाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात राजश्री शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे यांना कै. गोपाळ कृष्ण गोखले स्मृती आर्यभूषण पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी यांना कै. नरुभाऊ लिमये स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, आमदार किशोर दराडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

     पुढे ते म्हणाले की, सोशल मीडियानंतरमराठी भाषेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. भाषेत आमूलाग्र बदल झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आठ दहा वर्ष मराठी शाळा सुस्थितीत होत्या. मात्र, मराठीला आता किंमत नाही, असे मध्यम वर्गाला वाटायला लागले आणि अमेरिकेचे दरवाजे उघडायला लागल्यानंतर चित्र आमूलाग्र बदलले. त्यानंतर झपाट्याने मराठी शाळा बंद पडायला लागल्या. 

     पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र वाईट नाही. मात्र, त्याला कोणीतरी पुढाकार घेऊन वळण लावायला हवे. सहकार अनुभवल्याशिवाय कळत नाही.सहकाराचा अर्थ जे तुमच्याकडे नाही ते मला द्या, जे माझ्याकडे नाही ते तुम्हाला देतो आणि आपण मिळून उभारतो ती यंत्रणा असते. त्यात इदं न मम् तत्वाप्रमाणे वाटचाल करावी लागते. हल्ली लोकांच  कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. हवामान खात्यापासून निवडणूक आयोगापर्यंत कुठल्याच विभागावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीSocial Mediaसोशल मीडियाcongressकाँग्रेस