शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:43 IST

आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

पुणे : आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

     महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे आर्यभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संचालक मंडळाचे अंकुश काकडे, उपाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात राजश्री शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे यांना कै. गोपाळ कृष्ण गोखले स्मृती आर्यभूषण पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी यांना कै. नरुभाऊ लिमये स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, आमदार किशोर दराडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

     पुढे ते म्हणाले की, सोशल मीडियानंतरमराठी भाषेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. भाषेत आमूलाग्र बदल झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आठ दहा वर्ष मराठी शाळा सुस्थितीत होत्या. मात्र, मराठीला आता किंमत नाही, असे मध्यम वर्गाला वाटायला लागले आणि अमेरिकेचे दरवाजे उघडायला लागल्यानंतर चित्र आमूलाग्र बदलले. त्यानंतर झपाट्याने मराठी शाळा बंद पडायला लागल्या. 

     पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र वाईट नाही. मात्र, त्याला कोणीतरी पुढाकार घेऊन वळण लावायला हवे. सहकार अनुभवल्याशिवाय कळत नाही.सहकाराचा अर्थ जे तुमच्याकडे नाही ते मला द्या, जे माझ्याकडे नाही ते तुम्हाला देतो आणि आपण मिळून उभारतो ती यंत्रणा असते. त्यात इदं न मम् तत्वाप्रमाणे वाटचाल करावी लागते. हल्ली लोकांच  कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. हवामान खात्यापासून निवडणूक आयोगापर्यंत कुठल्याच विभागावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीSocial Mediaसोशल मीडियाcongressकाँग्रेस