शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठी भाषेच्या सद्यस्थितीला मध्यमवर्ग जबाबदार : कुमार केतकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:43 IST

आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

पुणे : आज मराठी शाळांची अवस्था अत्यंत वाईट आहे. याला कुठलाही राजकीय पक्ष, सरकार जवाबदार नाही तर या स्थितीला मध्यमवर्ग जवाबदार आहे असा थेट आरोप खासदार कुमार केतकर यांनी केला आहे.

     महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयातर्फे आर्यभूषण पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, संचालक मंडळाचे अंकुश काकडे, उपाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात राजश्री शाहू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्र. दि. शिंदे यांना कै. गोपाळ कृष्ण गोखले स्मृती आर्यभूषण पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी यांना कै. नरुभाऊ लिमये स्मृती पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, आमदार किशोर दराडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.

     पुढे ते म्हणाले की, सोशल मीडियानंतरमराठी भाषेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. भाषेत आमूलाग्र बदल झाले आहेत. संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतर आठ दहा वर्ष मराठी शाळा सुस्थितीत होत्या. मात्र, मराठीला आता किंमत नाही, असे मध्यम वर्गाला वाटायला लागले आणि अमेरिकेचे दरवाजे उघडायला लागल्यानंतर चित्र आमूलाग्र बदलले. त्यानंतर झपाट्याने मराठी शाळा बंद पडायला लागल्या. 

     पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र वाईट नाही. मात्र, त्याला कोणीतरी पुढाकार घेऊन वळण लावायला हवे. सहकार अनुभवल्याशिवाय कळत नाही.सहकाराचा अर्थ जे तुमच्याकडे नाही ते मला द्या, जे माझ्याकडे नाही ते तुम्हाला देतो आणि आपण मिळून उभारतो ती यंत्रणा असते. त्यात इदं न मम् तत्वाप्रमाणे वाटचाल करावी लागते. हल्ली लोकांच  कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. हवामान खात्यापासून निवडणूक आयोगापर्यंत कुठल्याच विभागावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेmarathiमराठीSocial Mediaसोशल मीडियाcongressकाँग्रेस