शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांसाठी फक्त ५ फायलेरिया निरीक्षक

By admin | Updated: December 4, 2014 02:45 IST

राज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना,

अजय महाडिक, मुंबईराज्यात डेंग्यू आणि मलेरियाच्या थैमानाच्या रुग्ण आकडेवारीने एकीकडे आरोग्य प्रशासनाला घाम फोडला असताना, या आजारांचा फैलाव प्रतिबंधित कारणाऱ्या फायलेरिया विभागाच्या भरतीचे घोंगडे ठाणे महानगरपालिकेने १९९१पासून भिजत ठेवले आहे. २०११च्या जनगणनेनुसार १८ लाख १८ हजार ८७२ लोकसंख्येच्या या शहरात डेंग्यू रोखण्यासाठी फक्त २३५ कर्मचारी कागदावर दिसतात. ५० हजार नागरिकांमागे १ फायलेरिया निरीक्षक असे स्पष्ट शासकीय धोरण असतानाही त्याकडे पाठ फिरवण्यात आली आहे. आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणाऱ्या या विभागाकडे अद्याप स्वतंत्र अर्थसंकल्प नसून कायम कर्मचाऱ्यांचे पगार वगळता वारंवार आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अर्थसंकल्पातून हा खर्च भागवण्यात येतो, हे विशेष!ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात मलेरिया व डेंग्यू नियंत्रणासाठी वेगळा कर्मचारीवर्ग नेमणे व त्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असणे याबाबत वारंवार विभागीय स्तरावर मागणी होत आहे. तत्कालीन आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या कारकिर्दीत फायलेरिया विभागात अत्यावश्यक म्हणून २६९ रिक्त पदांच्या भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र सदर भरती प्रस्ताव ‘अनावश्यक’ या शेऱ्यासह परत पाठविण्यात आला. सध्या या प्रस्तावाची फाईल आस्थापना विभागात पडून आहे.शासनाच्या धोरणानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या फायलेरिया विभागात २३५ कर्मचारी वगळता २६९ पदे भरणे आवश्यक असल्याचा ताळेबंद आस्थापना विभागाकडे आहे. यात ३१ फायलेरिया निरीक्षक, ३६ वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, २८ कीटक समाहक, १७४ क्षेत्र कार्यकर्ता या पदांचा अंतर्भाव आहे. या सर्व पदांवर नेमणूक झाल्यास महापालिकेच्या तिजोरीवर वर्षाला २,५२,७९,५०० रुपये (कोटी) एवढा बोजा अपेक्षित आहे. १८ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येचा हा गावगाडा हाकताना महापालिकेच्या फायलेरिया विभागाला वर्ष २०१२पर्यंत दरवर्षी कंत्राटी कामगार घ्यावे लागत होते. त्यानंतर आवश्यकता म्हणून ५० सफाई कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे, मात्र फायलेरिया विभागातीलच काही कर्मचारी इतर विभागांत वळते केल्याचेही वास्तव आहे.