शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 07:00 IST

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे

ठळक मुद्देगोदावरींमुळे औरंगाबाद विभागाला दिलासा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. तर, गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात जलप्राण फुंकले आहेत. यंदा जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बऱ्याचशा भागाला दिलासा मिळाला आहे. राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताऱ्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफुाटंचे असलेले राज्यातील सर्वात मोठे धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याने वेढली गेली. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात थैमान घातले. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने तेथेही नदीकाठची घरे पाण्याखाली गेली. भीमा आणि कृष्णामाईने आपला काठ सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसंकट आले. राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठे प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), ५.०३ (१४.८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडीधरण भरणाच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २.८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदभार्तील बºयाच भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात, असे चित्र आहे. --१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमधे विभाग        साठा टीएमसी    आजची टक्केवारी        गेल्यावषीर्ची टक्केवारी अमरावती    २८.३२        २७.८९            ४३.३औरंगाबाद    ७९.५९        ३०.५८            १९.३२    कोकण    १०६.७६        ८६.१४            ८९.७५    नागपूर    ६३.६८        ३९.१५            ४०.३१    नाशिक    १२७.९५        ६०.३५            ५६    पुणे        ४५५.४९        ८४.८            ७९.५६एकूण        ८७४.७९        ६०.५८            ५७.९८    ---भीमा-कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणातील साठा टीएमसीत धरण               टीएमसी    टक्केवारीकोयना             ९४.९३       ९४.८२धोम                १०.९५        ९३.९६वारणावती       २५.५८        ९२.९५दूधगंगा           २२.९५         ९५.७२ऊरमोडी           ९.४०         ९७.४२डिंभे                १२.४२        ९९.४३पवना              ८.४६         ९९.४४मुळशी             १८.४६        १००वरसगाव         १२.८२        १००पानशेत           १०.६५        १००निरा देवघर    ११.७३         १००भाटघर         २३.५०         १००वीर              ९.३४          ९९.२८उजनी           ५३.५७         १००        

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी