शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

मराठवाड्यातील पाणीसाठा तिशीतच : पश्चिम महाराष्ट्रातील धरणे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 07:00 IST

पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे

ठळक मुद्देगोदावरींमुळे औरंगाबाद विभागाला दिलासा

पुणे : पश्चिम महाराष्ट्र जलसंकटातून आता सावरत असला तरी मराठवाडा व विदर्भाच्या भागात समाधानकारक पाऊस नसल्याने हा भाग कोरड्या दुष्काळाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कृष्णा आणि भीमा नद्यांच्या खोऱ्यातील पर्जन्य छायेच्या भागाला जलयुक्त केले आहे. तर, गोदावरीने औरंगाबाद विभागाची जीवन वाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात जलप्राण फुंकले आहेत. यंदा जायकवाडीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने मराठवाड्यातील बऱ्याचशा भागाला दिलासा मिळाला आहे. राज्यात झालेल्या विषम पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. पुणे, सांगली, कोल्हापूर व साताऱ्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला. भीमा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल ११७.४७ अब्ज घनफुाटंचे असलेले राज्यातील सर्वात मोठे धरण भरले. त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने पाऊस नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील काही गावे पाण्याने वेढली गेली. कृष्णा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे सांगली, कोल्हापूर व साताऱ्यात थैमान घातले. उत्तर कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागल्याने तेथेही नदीकाठची घरे पाण्याखाली गेली. भीमा आणि कृष्णामाईने आपला काठ सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात जलसंकट आले. राज्यातील मराठवाडा व विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस पेरणी झालेली नाही. मराठवाड्याच्या अमरावती विभागातील मोठ्या प्रकल्पात क्षमतेच्या २९ व औरंगाबादला ४६ टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील मोठे प्रकल्पांपैकी वाण धरणात २.१९ (७५.८८ टक्के), ऊर्ध्व वर्धा ९.३५ (४७ टक्के), ५.०३ (१४.८ टक्के) टीएमसी पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागातील जायकवाडी धरणात ७०.१५ टीएमसी (९१.५१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गोदावरी खोºयात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा जायकवाडीधरण भरणाच्या मार्गावर आहे. येलदरी धरणाची उपयुक्त साठ्याची क्षमता २.८.५०, निम्न मनार ४.८८ व निम्न तेरणा धरणाची क्षमता ३.२२ टीएमसी आहे. मात्र धरणांत सध्या उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदभार्तील बºयाच भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू शकतात, असे चित्र आहे. --१९ आॅगस्ट अखेरचा उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमधे विभाग        साठा टीएमसी    आजची टक्केवारी        गेल्यावषीर्ची टक्केवारी अमरावती    २८.३२        २७.८९            ४३.३औरंगाबाद    ७९.५९        ३०.५८            १९.३२    कोकण    १०६.७६        ८६.१४            ८९.७५    नागपूर    ६३.६८        ३९.१५            ४०.३१    नाशिक    १२७.९५        ६०.३५            ५६    पुणे        ४५५.४९        ८४.८            ७९.५६एकूण        ८७४.७९        ६०.५८            ५७.९८    ---भीमा-कृष्णा खोऱ्यातील प्रमुख धरणातील साठा टीएमसीत धरण               टीएमसी    टक्केवारीकोयना             ९४.९३       ९४.८२धोम                १०.९५        ९३.९६वारणावती       २५.५८        ९२.९५दूधगंगा           २२.९५         ९५.७२ऊरमोडी           ९.४०         ९७.४२डिंभे                १२.४२        ९९.४३पवना              ८.४६         ९९.४४मुळशी             १८.४६        १००वरसगाव         १२.८२        १००पानशेत           १०.६५        १००निरा देवघर    ११.७३         १००भाटघर         २३.५०         १००वीर              ९.३४          ९९.२८उजनी           ५३.५७         १००        

टॅग्स :PuneपुणेDamधरणRainपाऊसWaterपाणी