शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

देशातील पहिल्या डिजिटल व्हीलेजमध्ये ऑनलाईन व्यवहारास प्रतिसाद नाही, मेळघाटातील हरिसाल गावत समस्या ‘जैसे थे’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 17:29 IST

देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्हा मुख्यालयापासून १४५ किलोमीटर अंतरावर मुख्य मार्गावरील हे गाव एक वर्षापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले.. डिजिटल व्हीलेजच्या कार्यालय सोफासेट व अद्यावत सुविधांनी सज्ज आहे. मात्र काम करण्यासाठी एकच ऑपरेटर हजर होता.

धारणी / अमरावती - देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे. हरीसालवासीयांसाठी गावात लाल दिव्याच्या आलीशान गाड्या येऊ लागल्यामुळे काही दिवसातच कायापालट होईल अशी आशा निर्माण झाली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षाच्या काळात या गावातील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. 

अमरावती जिल्हा मुख्यालयापासून १४५ किलोमीटर अंतरावर मुख्य मार्गावरील हे गाव एक वर्षापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले. गावात अनेक गोष्टी बदलत आहेत यात शंकाच नाही. डिजिटल व्हीलेजच्या कार्यालय सोफासेट व अद्यावत सुविधांनी सज्ज आहे. मात्र काम करण्यासाठी एकच ऑपरेटर हजर होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात टेली मेडिसीन केंद्र देण्यात आले आहे. मात्र, बरेच रुग्ण थेट धारणी येथे रेफर केले जातात, असे गावक-यांनी सांगितले. जि. प. शाळा, आश्रमशाळा हरिसाल व पोष्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा चिखली यांचेसह दोन अंगणवाडी केंद्रात ई-लर्निंग सुरू आहे. 

मात्र नेटची स्पीड कमी असल्याने विद्यार्थ्यांना संगणकावरून काम करताना अडचण येत असल्याची तक्रार मुख्याध्यापक सोपान घोरमाळे यांनी केल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आली नाही. 

गावातील राशन कार्ड स्मार्ट करण्यात येत आहे. परंतु दोन महिन्यापासून स्मार्ट राशन कार्ड बनण्याचे काम ठप्प पडले आहे. गावात एटीएम सुविधा केंद्र देण्यात आले आहे. काल हे एटीएम बंद होते. तसेच १६०० खाते ऑनलाईन करण्यात आले असून ४०० बाकी असून ते पूर्ण केले जात आहे. गावातील व्यापाºयांना पीटीएम व बीएचआयएम अ‍ॅप दिले आहे. मात्र हे व्यवहार ठप्प आहे. हरिसालच्या सरपंच महिला आहे. गरिब असल्याने त्यांनाही शेती व मजुरीशिवाय पर्याय नाही हे विशेष. 

एकाच वेळी कार्यरत असाव्या यंत्रणाहरिसालमध्ये ११ यंत्रणा काम करीत असले तरी गावात बदल घडून गावक-यांच्या आयुष्यात बदल झालेला नाही. प्रत्येक यंत्रणेचे काम करण्याचे दिवस वेगवेगळे असल्याने खरोखरच काय प्रकार सुरू आहे याची माहिती गावक-यांना देखील नाही. एकाच वेळी सर्व यंत्रणा कामास लागाव्या अशी मागणी गावकरी करीत आहे. 

जुन्या गावाकडे लक्षच नाहीडिजिटल व्हीलेजचे कार्यालय नव्या व समृद्ध लोकवस्ती असलेल्या भागात आहे. मात्र जुना हरिसाल जेथे आजही आठवडी बाजार दर बुधवारी भरला जातो तेथील समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासाकडे अधिकारी लक्ष देतील का? असा सवाल करण्यात आला.  देशातील पहिले डिजिटल ग्राम असल्यामुळे येथील विकासासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. ज्या गोष्टींची मागणी केली जाईल. ती सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हरिसाल केवळ देशाच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या नकाशावर दिसावे असा आमचा प्रयत्न आहे. - विजय राठोडएसडीओ, धारणी 

 शाळा, अंगणवाडी,  ग्रामपंचायत, रेशन दुकाने डिजिटल झाली. मोफत इंटरनेट सुविधा मिळत आहे. रोजगारासाठी आॅनलाईनचा पर्याय आहे. पण त्यासाठी ५०-६० हजारांचा खर्च होतो. व्हीसीच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांकडे अनेक मागण्या केल्या आहेत. अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.- गणेश येवले उपसरपंच, हरिसाल

 गावात मोबाईल चांगला चालतो यात शंकाच नाही, मात्र गावकºयांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. डिजिटलच्या माध्यमातून रोजगार उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. यासाठी ५०-६० हजार खर्च आहे तो सर्वांना शक्य होत नाही.- नितीन नाथ ग्रामस्थ हरिसाल

टॅग्स :digitalडिजिटल