शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

देशातील पहिल्या डिजिटल व्हीलेजमध्ये ऑनलाईन व्यवहारास प्रतिसाद नाही, मेळघाटातील हरिसाल गावत समस्या ‘जैसे थे’  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 17:29 IST

देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे.

ठळक मुद्देअमरावती जिल्हा मुख्यालयापासून १४५ किलोमीटर अंतरावर मुख्य मार्गावरील हे गाव एक वर्षापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले.. डिजिटल व्हीलेजच्या कार्यालय सोफासेट व अद्यावत सुविधांनी सज्ज आहे. मात्र काम करण्यासाठी एकच ऑपरेटर हजर होता.

धारणी / अमरावती - देशातील पहिले डिजिटल व्हीलेज होण्याचा मान धारणी तालुक्यातील हरिसाल या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावास मिळाला आहे. हरीसालवासीयांसाठी गावात लाल दिव्याच्या आलीशान गाड्या येऊ लागल्यामुळे काही दिवसातच कायापालट होईल अशी आशा निर्माण झाली. मात्र गेल्या एक ते दीड वर्षाच्या काळात या गावातील परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. 

अमरावती जिल्हा मुख्यालयापासून १४५ किलोमीटर अंतरावर मुख्य मार्गावरील हे गाव एक वर्षापूर्वी अचानक प्रकाशझोतात आले. गावात अनेक गोष्टी बदलत आहेत यात शंकाच नाही. डिजिटल व्हीलेजच्या कार्यालय सोफासेट व अद्यावत सुविधांनी सज्ज आहे. मात्र काम करण्यासाठी एकच ऑपरेटर हजर होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात टेली मेडिसीन केंद्र देण्यात आले आहे. मात्र, बरेच रुग्ण थेट धारणी येथे रेफर केले जातात, असे गावक-यांनी सांगितले. जि. प. शाळा, आश्रमशाळा हरिसाल व पोष्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा चिखली यांचेसह दोन अंगणवाडी केंद्रात ई-लर्निंग सुरू आहे. 

मात्र नेटची स्पीड कमी असल्याने विद्यार्थ्यांना संगणकावरून काम करताना अडचण येत असल्याची तक्रार मुख्याध्यापक सोपान घोरमाळे यांनी केल्यानंतरही त्यात सुधारणा करण्यात आली नाही. 

गावातील राशन कार्ड स्मार्ट करण्यात येत आहे. परंतु दोन महिन्यापासून स्मार्ट राशन कार्ड बनण्याचे काम ठप्प पडले आहे. गावात एटीएम सुविधा केंद्र देण्यात आले आहे. काल हे एटीएम बंद होते. तसेच १६०० खाते ऑनलाईन करण्यात आले असून ४०० बाकी असून ते पूर्ण केले जात आहे. गावातील व्यापाºयांना पीटीएम व बीएचआयएम अ‍ॅप दिले आहे. मात्र हे व्यवहार ठप्प आहे. हरिसालच्या सरपंच महिला आहे. गरिब असल्याने त्यांनाही शेती व मजुरीशिवाय पर्याय नाही हे विशेष. 

एकाच वेळी कार्यरत असाव्या यंत्रणाहरिसालमध्ये ११ यंत्रणा काम करीत असले तरी गावात बदल घडून गावक-यांच्या आयुष्यात बदल झालेला नाही. प्रत्येक यंत्रणेचे काम करण्याचे दिवस वेगवेगळे असल्याने खरोखरच काय प्रकार सुरू आहे याची माहिती गावक-यांना देखील नाही. एकाच वेळी सर्व यंत्रणा कामास लागाव्या अशी मागणी गावकरी करीत आहे. 

जुन्या गावाकडे लक्षच नाहीडिजिटल व्हीलेजचे कार्यालय नव्या व समृद्ध लोकवस्ती असलेल्या भागात आहे. मात्र जुना हरिसाल जेथे आजही आठवडी बाजार दर बुधवारी भरला जातो तेथील समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासाकडे अधिकारी लक्ष देतील का? असा सवाल करण्यात आला.  देशातील पहिले डिजिटल ग्राम असल्यामुळे येथील विकासासाठी सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. ज्या गोष्टींची मागणी केली जाईल. ती सेवा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हरिसाल केवळ देशाच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या नकाशावर दिसावे असा आमचा प्रयत्न आहे. - विजय राठोडएसडीओ, धारणी 

 शाळा, अंगणवाडी,  ग्रामपंचायत, रेशन दुकाने डिजिटल झाली. मोफत इंटरनेट सुविधा मिळत आहे. रोजगारासाठी आॅनलाईनचा पर्याय आहे. पण त्यासाठी ५०-६० हजारांचा खर्च होतो. व्हीसीच्या माध्यमातून जिल्हाधिकाºयांकडे अनेक मागण्या केल्या आहेत. अनेक गोष्टींसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.- गणेश येवले उपसरपंच, हरिसाल

 गावात मोबाईल चांगला चालतो यात शंकाच नाही, मात्र गावकºयांना शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. डिजिटलच्या माध्यमातून रोजगार उभारण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते. यासाठी ५०-६० हजार खर्च आहे तो सर्वांना शक्य होत नाही.- नितीन नाथ ग्रामस्थ हरिसाल

टॅग्स :digitalडिजिटल