शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ऑनलाइन पशुधन गणना ; गोवंश, म्हशींच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 07:00 IST

पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचे ८९.१४ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घटकेंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना

पुणे: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने पाळीव पशुंच्या गणनेचे काम केले जात आहे. गेल्या पाच वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घट झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली.  पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.त्यामुळे शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पहिली पशुगनणा १९१९-२० मध्ये घेण्यात आली होती.तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये नववी पशुगणना ब्युरो ऑफ इकोनॉमिक्स व स्टॅटिस्ट्क्स यांच्या मार्फत घेण्यात आली होती. तर १९७८ पासून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणना घेतली जात आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना केली जात असून पशुगणनेचे ८९.१४ टक्के काम पूर्ण झाले आहे.पशुसंवर्धन विभागातर्फे विसाव्या पशुगणनेत पशुवर्गाची प्रजाती निहाय माहिती संकलित केली जात असून एकूण १५ पाळीव प्राण्यांची गणना केली जात आहे. प्रामुख्याने गाई-बैल (देशी,विदेशी,संकरीत ) म्हशी व रेडे, मेंढरे (देशी,विदेशी,संकरीत ) शेळ्या, डुकरे, घोडे, खेचर, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती,ससे यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.त्याचप्रमाणे कोंबड्या, कोंकडे, बदके, क्लेव, टर्की, इमू आदी पक्षांचीही गणना करण्यात आली.पशुसंवर्धन विभागाने २०१७ मध्ये पशुगणना करणे अपेक्षित होते. परंतु,केंद्र शासनाने देशात एकाच वेळी आॅनलाईन पध्दतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्राणी गणनेचे काम सुरू केले. त्यासाठी प्रत्येक गावात/वार्डात प्रत्यक्ष भेटी देवून घरोघरी असणा-या पशुंची गणना केली आहे. त्यासाठी राज्यात एकूण ७ हजार १२६ टॅबलेटस् खरेदी करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात ४ हजार ५०० कुटुंबास एक प्रगणक व शहरी भागात ६ हजार कुटुंबास एक या पध्दतीने गाव व वार्डामध्ये जावून माहिती जमा केली आहे. परंतु,पशुगणनेचे दहा टक्के काम अद्याप पूर्ण झालेले नाही.पशुगणना करण्याची पशुसंवर्धन विभागातर्फे २००७ मध्ये आणि २०१२ मध्ये प्राणी गणना करण्यात आली होती. त्यात ९ ते १० टक्के पाळीव पशुमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच २०१२ पासून सुमारे दोन ते तीन वर्ष राज्यात पडलेला दुष्काळ,सततची पाणी टंचाई, चारा पिके सोडून नगदी पिके घेण्याचे वाढलेले प्रमाण, शेतीत काम करण्याबाबत तरूणाईमध्ये असणारी उदासिनता आदी कारणांमुळे काही पाळीव पशुंची संख्या कमी झाली आहे,असेही सूत्रांनी सांगितले.----------------------------राज्यात २०१२ मध्ये १४ लाख ४४ हजार ६५९ दुभत्या गाई ,५ लाख ९३ हजार आटलेल्या गाई आणि ७७ हजार १२८ एकदाही न व्यालेल्या गाई अशा एकूण २१ लाख १४ हजार ८५१ संकरीत गाई होत्या.तर ३२ लाख ४० हजार गावठी गायी होत्या.त्याचप्रमाणे २१ लाख ६१ हजार ९९० दुभत्या म्हशी,१० लाख ९ हजार ४८५ आटलेल्या म्हशी १ लाख ४८ हजार ७३४ एकदाही न व्यालेल्या म्हशी अशा एकूण ३३ लाख २० हजार २०९ म्हशी होत्या. त्यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी