शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

राज्यात ऑनलाइन पशुधन गणना ; गोवंश, म्हशींच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 07:00 IST

पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.

ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाचे ८९.१४ टक्के पशुगणनेचे काम पूर्ण राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घटकेंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना

पुणे: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ऑनलाईन पध्दतीने पाळीव पशुंच्या गणनेचे काम केले जात आहे. गेल्या पाच वर्षात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे राज्यातील काही पाळीव पशुंच्या संख्येत २०१२ च्या तुलनेत घट झाली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील सूत्रांनी दिली.  पशुसंवर्धन हा शेतीवर अवलंबून असणा-या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न देणारा महत्वाचा व्यवसाय आहे.त्यामुळे शासनातर्फे दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. पहिली पशुगनणा १९१९-२० मध्ये घेण्यात आली होती.तर महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर १९६१ मध्ये नववी पशुगणना ब्युरो ऑफ इकोनॉमिक्स व स्टॅटिस्ट्क्स यांच्या मार्फत घेण्यात आली होती. तर १९७८ पासून पशुसंवर्धन विभागामार्फत पशुगणना घेतली जात आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार १ ऑक्टोबर २०१८ पासून विसावी पशुगणना केली जात असून पशुगणनेचे ८९.१४ टक्के काम पूर्ण झाले आहे.पशुसंवर्धन विभागातर्फे विसाव्या पशुगणनेत पशुवर्गाची प्रजाती निहाय माहिती संकलित केली जात असून एकूण १५ पाळीव प्राण्यांची गणना केली जात आहे. प्रामुख्याने गाई-बैल (देशी,विदेशी,संकरीत ) म्हशी व रेडे, मेंढरे (देशी,विदेशी,संकरीत ) शेळ्या, डुकरे, घोडे, खेचर, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती,ससे यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.त्याचप्रमाणे कोंबड्या, कोंकडे, बदके, क्लेव, टर्की, इमू आदी पक्षांचीही गणना करण्यात आली.पशुसंवर्धन विभागाने २०१७ मध्ये पशुगणना करणे अपेक्षित होते. परंतु,केंद्र शासनाने देशात एकाच वेळी आॅनलाईन पध्दतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्राणी गणनेचे काम सुरू केले. त्यासाठी प्रत्येक गावात/वार्डात प्रत्यक्ष भेटी देवून घरोघरी असणा-या पशुंची गणना केली आहे. त्यासाठी राज्यात एकूण ७ हजार १२६ टॅबलेटस् खरेदी करण्यात आले.तसेच ग्रामीण भागात ४ हजार ५०० कुटुंबास एक प्रगणक व शहरी भागात ६ हजार कुटुंबास एक या पध्दतीने गाव व वार्डामध्ये जावून माहिती जमा केली आहे. परंतु,पशुगणनेचे दहा टक्के काम अद्याप पूर्ण झालेले नाही.पशुगणना करण्याची पशुसंवर्धन विभागातर्फे २००७ मध्ये आणि २०१२ मध्ये प्राणी गणना करण्यात आली होती. त्यात ९ ते १० टक्के पाळीव पशुमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच २०१२ पासून सुमारे दोन ते तीन वर्ष राज्यात पडलेला दुष्काळ,सततची पाणी टंचाई, चारा पिके सोडून नगदी पिके घेण्याचे वाढलेले प्रमाण, शेतीत काम करण्याबाबत तरूणाईमध्ये असणारी उदासिनता आदी कारणांमुळे काही पाळीव पशुंची संख्या कमी झाली आहे,असेही सूत्रांनी सांगितले.----------------------------राज्यात २०१२ मध्ये १४ लाख ४४ हजार ६५९ दुभत्या गाई ,५ लाख ९३ हजार आटलेल्या गाई आणि ७७ हजार १२८ एकदाही न व्यालेल्या गाई अशा एकूण २१ लाख १४ हजार ८५१ संकरीत गाई होत्या.तर ३२ लाख ४० हजार गावठी गायी होत्या.त्याचप्रमाणे २१ लाख ६१ हजार ९९० दुभत्या म्हशी,१० लाख ९ हजार ४८५ आटलेल्या म्हशी १ लाख ४८ हजार ७३४ एकदाही न व्यालेल्या म्हशी अशा एकूण ३३ लाख २० हजार २०९ म्हशी होत्या. त्यात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेdroughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी