शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:32 IST

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू होते. आपल्या मुलांना चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा म्हणून सगळेच पालक प्रयत्नशील असतात. आता राज्यभरात ११वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात १९ मेपासून सुरू होणार असून, ११वीचे वर्ग ऑगस्ट महिन्याच्या ११ तारखेपासून सुरू होणार आहेत.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह आता अहिल्यानगरमध्ये देखील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. मात्र, केवळ राज्य राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचाच यात समावेश असणार आहे. 

शाळा-महाविद्यालयांना कसं होता येणार या प्रक्रियेत सामील?

शासन मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित, अंशत: अनुदानित या सर्व प्रकारच्या शाळा आणि महाविद्यालयांना या प्रवेश प्रक्रियेत सामील होता येणार असून, यासाठी त्यांना १५ मेपर्यंत शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे.  

विद्यार्थ्यांना कधी आणि कशी करावी लागेल प्रक्रिया?दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १९ मेपासून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना १० पसंती क्रमांक द्यावे लागणार आहेत. त्यानंतर २८ मेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या एकूण चार फेऱ्या होतील, तर, पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवततेनुसार राबवली जाईल. मात्र, अद्याप यासाठीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. 

ऑनलाईन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवताना व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागा, ५० टक्के जागा अल्पसंख्यांकांसाठी, तर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १० टक्के जागा राखीव असणार आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी