शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

शाळेत न येणाऱ्या मुलाच्या पालकाला एक रुपया दंड

By admin | Updated: June 26, 2017 01:10 IST

राजर्षींचा सक्तीच्या शिक्षणाचा जाहीरनामा : कोल्हापूर संस्थानातील १०० वर्षांपूर्वीच्या शिक्षणविषयक जागरुकतेचा नमुना

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्कआज एखादा विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला तर ‘मोबाईल’वरून त्याच्या घरी ‘मेसेज’ दिला जातो. पालकांना शाळेत बोलावून त्यांचेही उद्बोधन केले जाते. मात्र १०० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शाळेत जी मुले येत नाहीत, त्यांच्या पालकांना एक रुपया दंड करण्याचा आदेश काढला होता. आपल्या संस्थानातील प्रजेच्या मुलांनी सक्तीने शिक्षण घ्यावे, यासाठी शाहू महाराजांनी हा कठोरपणा स्वीकारला होता. आज एकीकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा होऊन त्याची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी शाहू महाराजांना १०० वर्षांपूर्वी ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध’ असल्याची जाणीव झाली होती. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थानातील जनतेच्या कल्याणासाठी यासारखे कायदे तयार केले. सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याचा जाहीरनामा २९ सप्टेंबर १९१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. ‘करवीर इलाख्यातील आमच्या सर्व प्रजाजनांना लिहिता-वाचता येऊन आपली स्थिती ओळखून सुधारण्यास त्यांनी समर्थ व्हावे म्हणून खाली दिल्याप्रमाणे नियम करण्यात येत आहे,’असा उद्देश या कायद्यामध्ये प्रारंभीच नमूद करण्यात आला आहे. यानंतर शाळा म्हणजे काय, विद्यार्थी व्याख्या अशा कायदेशीर बाबींचा समावेश आहे. पाच भागांमध्ये हा कायदा विभागला असून, यातील चौथ्या भागामध्ये शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे.१ शिक्षणास योग्य वयाच्या मुलांची यादीची प्रसिद्धी झाल्यापासून ३० दिवसांचे आत मुलांच्या आईबापांनी आपली मुले शाळेत पाठविली पाहिजेत. अथवा जर अपिल केले असेल तर आणि अपिलात माफी मिळाली नसेल, तर अपिलाच्या निकालाची समज मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत मुले शाळेस पाठविली पाहिजेत.२ नियम ११ मध्ये सांगितल्याप्रमाणे मुलांच्या नावांची यादी आल्यावर त्यांचे पालकांस मामलेदाराने समन्स काढावे आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व ते संयुक्तिक न दिसल्यास प्रत्येक मुलाबद्दल एक रुपयापर्यंत दंड करावा. हा दंड प्रत्येक महिन्यास मुले शाळेत जाईपर्यंत करावा. ३ ३० दिवसांचे आत दंड न भरल्यास लॅँड रेव्हेन्यूचे नियमाप्रमाणे जंगम जिंदगी जप्त करून दंडाचा वसूल करावा.४ शाळेत मुलांस घातल्यावर मुले शाळेत वेळच्या वेळी जातात की नाही हे पाहणे हे आईबापांचे कर्तव्य समजले जाईल. ५ एका महिन्यात मुले १५ दिवस गैरहजर राहिली तर तशा विद्यार्थ्यांची व पालकांची यादी पाटलांकडे द्यावी. चौकशीनंतर यात आईबापाचा दोष दिसल्यास पहिल्याप्रसंगी ४२ आणेपर्यंत दंड करावा व पुढील प्रत्येक प्रसंगी १ रुपयापर्यंत दंड करावा.६ एवढे करूनही आईबाप आपली मुले शाळेस पाठवीत नाहीत व त्यांना मजुरी करण्याकरिता पाठवितात, अगर शेतात पाठवितात असे दिसून आल्यास शिक्षा करणारे अधिकाऱ्यांनी १ रुपयापासून पाच रुपयांपर्यंत आईबापास दंड करावा.