शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख  

By अोंकार करंबेळकर | Updated: September 15, 2017 00:47 IST

शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.

ओतूर (जुन्नर, पुणे) : शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.वैभव मुराद्रे हा तो तरुण शेतकरी. स्वत: इंजिनीअर पण त्याने शेतीच करायची ठरवली. ओतूर येथे झालेल्या किसान महाचर्चेमध्ये त्याने आपली यशोगाथा ऐकवली तेव्हा सर्व शेतकरी थक्क झाले. या चर्चेमध्ये यूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाºया जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यांतील शेतकºयांनी अनुभवांचे कथन केले. झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेता आले, असे त्यांनी सांगितले.वैभव म्हणतो, अभियांत्रिकीनंतर १०-१५ हजारांच्या नोकरीचा पर्याय होताच; पण दुसरीकडे घरची ४ एकर शेतीही होती. त्यामुळे शेतीतच कष्ट करून दाखवायचा निर्णय घेतला. पहिली एकदोन वर्षे योग्य हमीभाव न मिळाल्याने तोटाही झाला; पण प्रयत्न सोडले नाहीत. या वर्षी त्याने एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी यूपीएलचे झेबा तंत्रज्ञान वापरले. मक्याच्या स्टार्चपासून केलेल्या झेबामुळे टोमॅटोच्या मुळांना योग्य प्रमाणात व सतत अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होत राहिला, पर्यायाने उत्पन्नही भरपूर मिळाले. घरच्या सर्व लोकांनी मनापासून कष्ट केले तर शेतीसारखा व्यवसाय नाही, असे वैभवचे मत आहे. एक एकर शेतीसाठी त्याला दीड लाख खर्च आला तर उत्पन्न साडेनऊ लाख रुपयांचे मिळाले. टोमॅटोबरोबर कांदा, कॉलीफ्लॉवर अशी पिकेही तो घेतो.झेबामुळे पांढºया मुळांची वाढ चांगली झाली आणि रोपेही कमी प्रमाणात मेली, असेही तो म्हणतो.झेबामुळे शेती उत्पादनात क्रांतीझेबा हे मक्याच्या स्टार्चपासून तयार केलेले उत्पादन आहे. आपल्या वजनाच्या चारशे पट पाणी धरून ठेवणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शोषलेले पाणी योग्य वेळेस सतत मुळांना देत राहणं हे झेबाचं मुख्य काम आहे. मुळांभोवती पाणी व पोषकद्रव्ये साठवल्यामुळे पिकांना मोठा फायदा होतो. वाहून जाणारी पोषकद्रव्ये रोखल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. जमिनीत हवा खेळती राहून पोतही सुधारतो. कांदा, डाळिंब, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांसाठी झेबा वापरलं आहे. त्यामुळे पिके चटकन व सशक्त उभारी घेत असल्याचं दिसून आलं आहे. - समीर टंडन, क्षेत्रीय संचालक, यूपीएल

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत