शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

एका एकरातून वर्षभरात कमावले साडेनऊ लाख  

By अोंकार करंबेळकर | Updated: September 15, 2017 00:47 IST

शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.

ओतूर (जुन्नर, पुणे) : शेतीत काहीच राहिलं नाही, अशी ओरड करणा-या सा-यांसाठी जुन्नर तालुक्यातल्या रोहोकडी गावच्या एका तरुणाने एक नवा आदर्श निर्माण केला असून, आपल्या जिद्दीच्या जोरावर केवळ एका एकरातून वर्षभरात त्याने साडेनऊ लाख रुपये कमावले आहेत.वैभव मुराद्रे हा तो तरुण शेतकरी. स्वत: इंजिनीअर पण त्याने शेतीच करायची ठरवली. ओतूर येथे झालेल्या किसान महाचर्चेमध्ये त्याने आपली यशोगाथा ऐकवली तेव्हा सर्व शेतकरी थक्क झाले. या चर्चेमध्ये यूपीएल कंपनीचे झेबा उत्पादन वापरणाºया जुन्नर, पुरंदर अशा अनेक तालुक्यांतील शेतकºयांनी अनुभवांचे कथन केले. झेबामुळे डाळिंब, टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेता आले, असे त्यांनी सांगितले.वैभव म्हणतो, अभियांत्रिकीनंतर १०-१५ हजारांच्या नोकरीचा पर्याय होताच; पण दुसरीकडे घरची ४ एकर शेतीही होती. त्यामुळे शेतीतच कष्ट करून दाखवायचा निर्णय घेतला. पहिली एकदोन वर्षे योग्य हमीभाव न मिळाल्याने तोटाही झाला; पण प्रयत्न सोडले नाहीत. या वर्षी त्याने एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी यूपीएलचे झेबा तंत्रज्ञान वापरले. मक्याच्या स्टार्चपासून केलेल्या झेबामुळे टोमॅटोच्या मुळांना योग्य प्रमाणात व सतत अन्नद्रव्ये आणि पाण्याचा पुरवठा होत राहिला, पर्यायाने उत्पन्नही भरपूर मिळाले. घरच्या सर्व लोकांनी मनापासून कष्ट केले तर शेतीसारखा व्यवसाय नाही, असे वैभवचे मत आहे. एक एकर शेतीसाठी त्याला दीड लाख खर्च आला तर उत्पन्न साडेनऊ लाख रुपयांचे मिळाले. टोमॅटोबरोबर कांदा, कॉलीफ्लॉवर अशी पिकेही तो घेतो.झेबामुळे पांढºया मुळांची वाढ चांगली झाली आणि रोपेही कमी प्रमाणात मेली, असेही तो म्हणतो.झेबामुळे शेती उत्पादनात क्रांतीझेबा हे मक्याच्या स्टार्चपासून तयार केलेले उत्पादन आहे. आपल्या वजनाच्या चारशे पट पाणी धरून ठेवणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शोषलेले पाणी योग्य वेळेस सतत मुळांना देत राहणं हे झेबाचं मुख्य काम आहे. मुळांभोवती पाणी व पोषकद्रव्ये साठवल्यामुळे पिकांना मोठा फायदा होतो. वाहून जाणारी पोषकद्रव्ये रोखल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते. जमिनीत हवा खेळती राहून पोतही सुधारतो. कांदा, डाळिंब, फ्लॉवर, टोमॅटो अशा पिकांसाठी झेबा वापरलं आहे. त्यामुळे पिके चटकन व सशक्त उभारी घेत असल्याचं दिसून आलं आहे. - समीर टंडन, क्षेत्रीय संचालक, यूपीएल

टॅग्स :FarmerशेतकरीIndiaभारत