शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

५० हजारांसाठी कायपण! बायको मेली एकाची अन् हक्क गाजवताहेत तिघेजण, नेमका काय प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:58 IST

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या ५० हजारांच्या अनुदानासाठी तीन तीन अर्ज

सोमनाथ खताळ बीड : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकारी कार्यालयातून या अर्जांची खात्री व छाननी केली जात आहे. कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. परंतु ५० हजार रुपये मिळावेत, म्हणून ही आपलीच बायको होती, असे नाते टाकून तिघे तिघे हक्क गाजवत असल्याची धक्कादायक उदाहरणे समोर आली आहेत. परंतु नावातील फरक व नाते जुळत नसल्याने प्रशासनाने हे अर्ज नाकारल्याचे सूत्रांकडून समजते.     

कोरोनामुळे आतापर्यंत २ हजार ९६८ रुग्णांचा जीव गेला आहे. यात अनेकांच्या कुटुंबातील कर्ते पुरूष, महिला आहेत. अनेकांचे आई-वडील दोघेही या कोरोनाने हिरावून घेतले. काहींचे मुलगे, मुली आणि इतर नातेवाईकांचा कोरोनाने जीव घेतला. याच अनुषंगाने शासनाने मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३२६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील २ हजार ११७ अर्ज बरोबर असल्याने त्यांना अनुदान देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाला प्रस्ताव दिला आहे. लवकरच त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.   

...या कारणांमुळे नाकारले अर्जजे अर्ज नाकारले त्यात मुख्य कारण हे मृत्यूचे कारण अस्पष्ट असणे हे आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्हचा अहवाल नसणे, कोरोनामुक्त होऊन दोन महिन्यांनंतर मृत्यू होणे, नाते न जुळणे, एकासाठी तीन तीन अर्ज येणे अशा विविध कारणांसाठी हे अर्ज नाकारल्याचे सांगण्यात आले. 

आतापर्यंत जिल्ह्यातील २,११७ जणांचे अर्ज सानुग्रह अनुदानासाठी पात्र ठरले असून, तसा अहवाल शासनाला दिला आहे. १,०८७ अर्ज वेगवेगळ्या कारणाने नाकारले आहेत. - संताेष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

आमच्याकडे अर्ज येताच पॉझिटिव्ह, मृत्यू, नाते आदींची तपासणी केली जाते. तसेच ज्यांच्या अर्जात अडचणी आहेत, त्यांना एक तारीख देऊन समितीसमोर बोलावून घेतले जाते. येथे कागदपत्रांची पुन्हा तपासणी करून अर्जावर निर्णय घेतला जातो. - डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

 

टॅग्स :Beedबीडcorona virusकोरोना वायरस बातम्या