शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सीबीएसई बोर्ड बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, मेघना श्रीवास्तव देशात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 4:44 PM

‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देया परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकालमंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा (सीबीएसई) मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली असून गाझियाबाद येथील मेघना श्रीवास्तव हिने ५०० पैकी ४९९ गुण मिळवत देशात पहिला क्रमांक पटकावला. पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींचाच दबदबा राहिला आहे. परीक्षेच्या एकुण निकालाची टक्केवारी ८३.०१ एवढी आहे.‘सीबीएसई’मार्फत दि. ५ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत परिक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी बारा वाजता आॅनलाईन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेसाठी देशभरातून ११ लाख ८४ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ११ लाख ६ हजार ७७२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकुण ९ लाख १८ हजार ७६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८३.०१ टक्के परीक्षेचा निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा निकाल एक टक्क्यांनी अधिक आहे. एकुण विद्यार्थ्यांपैकी ८८.३१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७८.९९ एवढी आहे. मुलींच्या तुलनेत मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९.३२ टक्क्यांनी कमी आहे. एकुण उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ७३७ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांहून अधिक तर ७२ हजार ५९९ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.गाझियाबाद मधील स्टेप बाय स्टेप शाळेतील मेघना श्रीवास्तव हिने ९९.८ टक्के गुण मिळाले आहेत. इंग्रजी वगळता तिला सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. तर इंग्रजीमध्ये तिला ९९ गुण मिळाले. गाझियाबाद येथीलच अनुष्का चंद्रा हिला मेघनापेक्षा केवळ १ गुण कमी मिळाला असून ती ९९.६ टक्के गुणांसह देशात दुसरी आली आहे. तिसºया क्रमांकावर सात जण असून त्यांना प्रत्येकी ४९७ म्हणजे ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. चाहत बोधराज, आस्था बाम्बा, तनुजा काप्री, सुप्रिया कौशिक, नकुल गुप्ता, क्षितीज आनंद व अनन्या सिंग अशी त्यांची नावे आहेत. मंडळाच्या दहा विभागांमध्ये त्रिवेंद्रम विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.३२ टक्के लागला आहे. त्याखालोखाल चेन्नईचा ९३.८७ आणि दिल्ली विभागात ८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८Womenमहिलाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी