शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिरव्या स्वप्नांवर अवकाळीचा नांगर, खरिपानंतर हाती येणाऱ्या रब्बीलाही झोपवले; राज्यातील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 08:08 IST

Unseasonal Rain: राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

पुणे - राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवर झाले असून, नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.

अतिवृष्टी व गारपिटीने १७ जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याने पिकांना आणखी फटका बसू शकतो. पावसामुळे हवेत गारवा आल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

विदर्भ विदर्भात अकोला, वाशिम बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलढाण्यात गारपीट झाली आहे. कपाशी, तूर आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. 

मराठवाडा मराठवाड्यालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. विभागात एकाच रात्रीत ४०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने २,१४० गावांतील पिके संकटात आली आहेत.  

खान्देश  खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अहमदनगर जिल्ह्यातही अतोनात नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली आहे.  

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन अहवाल तातडीने सरकारकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

म्हणून होते गारपीट! डॉ. रंजन केळकर यांची माहिती  पुणे : हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हानिहाय पावसाची नोंद (मिलिमीटर) ठाणे         १८ पालघर         २६ नाशिक         २७ धुळे         २६ नंदुरबार         ६२ जळगाव         ३२ नगर         ३१ पुणे         १४ संभाजीनगर         ६१ जालना         ७१ बीड         २७ नांदेड         ३६ परभणी         ६५ बुलढाणा         ६० अकोला         ३२ वाशिम         ५० अमरावती         १४ यवतमाळ         २७ 

गुजरातमध्ये  २० मृत्यूगुजरातच्या अनेक भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागात वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला.  दाहोदमध्ये ४, भरूचमध्ये ३, तापीमध्ये २, तर  अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर व द्वारकामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र