शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

हिरव्या स्वप्नांवर अवकाळीचा नांगर, खरिपानंतर हाती येणाऱ्या रब्बीलाही झोपवले; राज्यातील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 08:08 IST

Unseasonal Rain: राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

पुणे - राज्यातील सर्वच भागात दाेन दिवसांपासून सुरू झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक  अंदाज कृषी विभागाने वर्तविला. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात सुमारे ३४ हजार हेक्टरवर झाले असून, नाशिक व नगर जिल्ह्यांत द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे.

अतिवृष्टी व गारपिटीने १७ जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे शनिवारी व रविवारी पाऊस झाला. पूर्व विदर्भ वगळता सर्वच जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली. राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत अवकाळी पाऊस सुरू राहणार असल्याने पिकांना आणखी फटका बसू शकतो. पावसामुळे हवेत गारवा आल्याने थंडी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

विदर्भ विदर्भात अकोला, वाशिम बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलढाण्यात गारपीट झाली आहे. कपाशी, तूर आणि संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे. 

मराठवाडा मराठवाड्यालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. विभागात एकाच रात्रीत ४०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने २,१४० गावांतील पिके संकटात आली आहेत.  

खान्देश  खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २८ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. अहमदनगर जिल्ह्यातही अतोनात नुकसान झाले आहे. घरांची मोठी पडझड झाली आहे.  

तत्काळ पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतीच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश सोमवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, तेथील जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेऊन अहवाल तातडीने सरकारकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर नुकसानभरपाई देण्याबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

म्हणून होते गारपीट! डॉ. रंजन केळकर यांची माहिती  पुणे : हिवाळ्यामध्ये पाऊस, गारपीट हे नवीन नाही. या महिन्यात असे हवामान असतेच. नोव्हेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस पडत असतो. हिवाळ्यात पश्चिम व पूर्वेकडील दोन्ही वारे महाराष्ट्रावर भिडत असल्याने इथे वादळी पाऊस आणि गारपीट होते, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे माजी महासंचालक व हवामानतज्ज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

जिल्हानिहाय पावसाची नोंद (मिलिमीटर) ठाणे         १८ पालघर         २६ नाशिक         २७ धुळे         २६ नंदुरबार         ६२ जळगाव         ३२ नगर         ३१ पुणे         १४ संभाजीनगर         ६१ जालना         ७१ बीड         २७ नांदेड         ३६ परभणी         ६५ बुलढाणा         ६० अकोला         ३२ वाशिम         ५० अमरावती         १४ यवतमाळ         २७ 

गुजरातमध्ये  २० मृत्यूगुजरातच्या अनेक भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. राज्याच्या विविध भागात वीज कोसळून २० जणांचा मृत्यू झाला.  दाहोदमध्ये ४, भरूचमध्ये ३, तापीमध्ये २, तर  अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर व द्वारकामध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र