शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:37 IST

देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांची हमी : १२ कोटी लिटरचा केला पुरवठाबी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात

पुणे : साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑईल कंपन्यांना ५१ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे. त्यापैकी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिना अखेरीस केला असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्या पैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. देशात यंदा ३०७ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस देशातील ४६६ कारखाने सुरु होते. तर, २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १ मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन ऊस गाळपातून ९२.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही ३०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेची विक्रमी आवक होत असल्याने, अनेक कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ऑईल कंपन्यांकडे तशा निविदा भरण्यात आल्या आहेत. निविदा दिल्या प्रमाणे इथेनॉलचा पुरवठा झाल्यास, ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटेल. फेब्रुवारी अखेरीस देशातील साखर कारखान्यांनी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. त्यामुळे साधारण १ लाख टनांनी साखर निर्मिती कमी झाली आहे. दरम्यान, देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील २३ कारखाने कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, १७० कारख्यांचे गाळप सुरु आहे. कर्नाटकात ४१.६९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील ३२ कारखाने बंद झाले असून, ३५ कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ७३.६१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तमिळनाडूतील ३२ कारखान्यांनी ४.७०, गुजरातमधील १४ कारखान्यांनी ८.८०, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील २५ कारखान्यांनी ५.७० लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहार ५.७५, उत्तराखंड २.५५, पंजाब ४.६०, हरयाणा ४.१५, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ४.१० लाख टन साखर उत्पादित केली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीPuneपुणे