शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच ऑईल कंपन्यांना मिळणार ५१ कोटी लिटर इथेनॉल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 13:37 IST

देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्यापैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे.

ठळक मुद्देसाखर कारखान्यांची हमी : १२ कोटी लिटरचा केला पुरवठाबी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात

पुणे : साखर उद्योगाच्या इतिहासात यंदा प्रथमच देशातील साखर कारखान्यांनी ऑईल कंपन्यांना ५१ कोटी लिटर इथेनॉलच्या पुरवठ्याची हमी दिली आहे. त्यापैकी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा फेब्रुवारी महिना अखेरीस केला असल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली. देशातील ५१५ साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात सहभागी झाले होते. त्या पैकी १९३ कारखाने महाराष्ट्रातील आहे. देशात यंदा ३०७ लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. फेब्रुवारी अखेरीस देशातील ४६६ कारखाने सुरु होते. तर, २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात १ मार्च अखेरीस ८३७.७२ लाख टन ऊस गाळपातून ९२.५० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या हंगामात देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदाही ३०७ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. सलग दोन वर्षे साखरेची विक्रमी आवक होत असल्याने, अनेक कारखान्यांनी यंदा इथेनॉल निर्मितीवर भर दिला असल्याचे दिसून येत आहे. बी हेवी मोलॅसिस आणि थेट उसाच्या रसापासून ५१ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ऑईल कंपन्यांकडे तशा निविदा भरण्यात आल्या आहेत. निविदा दिल्या प्रमाणे इथेनॉलचा पुरवठा झाल्यास, ५ लाख टनांनी साखर निर्मिती घटेल. फेब्रुवारी अखेरीस देशातील साखर कारखान्यांनी १२ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. त्यामुळे साधारण १ लाख टनांनी साखर निर्मिती कमी झाली आहे. दरम्यान, देशात फेब्रुवारी अखेरीस २४७.६८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील २३ कारखाने कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, १७० कारख्यांचे गाळप सुरु आहे. कर्नाटकात ४१.६९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. येथील ३२ कारखाने बंद झाले असून, ३५ कारखाने सुरु आहेत. उत्तर प्रदेशातील ११७ कारखान्यांनी ७३.६१ लाख टन साखर उत्पादित केली आहे. तमिळनाडूतील ३२ कारखान्यांनी ४.७०, गुजरातमधील १४ कारखान्यांनी ८.८०, आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील २५ कारखान्यांनी ५.७० लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहार ५.७५, उत्तराखंड २.५५, पंजाब ४.६०, हरयाणा ४.१५, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडने ४.१० लाख टन साखर उत्पादित केली आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीPuneपुणे