शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

राज्यात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर; २९ जणांचा बळी, मार्च महिन्यापासून उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 5:58 AM

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्यापासून राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी, यामुळे १ मार्च ते १४ मे या काळात उष्माघाताच्या रुग्णांची संख्या ५८० वर पोहोचली असून संशयित उष्माघाताच्या मृत्यूंची संख्या २९ झाली आहे. उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीने उष्माघाताने १७ मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाला दिली आहे.

उष्णतेच्या लाटेचा त्रास कोणत्या व्यक्तींना होण्याची शक्यता अधिक आहे, हे लक्षात घेऊन त्यांची विशेष काळजी घेण्यात यावी, यासाठी जनतेचे प्रबोधन करण्यात येते. उष्मा काही व्यक्तींना अधिक त्रासदायक ठरू शकतो, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे. उष्णता विकारांवर उपचार करण्यासाठी सर्व सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या वाढत्या उष्णतेमुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले.

- उष्णतेमुळे मुख्यत्वे किरकोळ स्वरुपाचा किंवा गंभीर स्वरुपाचा त्रास या प्रकारचा असतो. किरकोळ त्रासात उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटणे, हातापायाला गोळे येणे, चक्कर येणे अशा स्वरुपाचा असतो, तर गंभीर प्रकारात उष्माघाताचा समावेश होतो. 

- उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध आणि लहान मुले, स्थूल लोक, अयोग्य कपडे घातलेले लोक, पुरेशी झोप न झालेले लोक, गरोदर महिला, अनियंत्रित मधुमेह, हृदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण, दारुचे व्यसन असलेले लोक,  काही विशिष्ट औषधे घेत असलेले लोक आणि निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.

जिल्हा    रुग्ण    संशयित     उष्माघात मृत्यू ठाणे     २          ०    ०पुणे     ३३    ०     ०कोल्हापूर     १          ०     ०औरंगाबाद     १५    ५    २लातूर    १           १    १नाशिक     १७          ४    ४अकोला    ५१         ४     १नागपूर       ४६०         १५    ९एकूण       ५८०          २९    १७

टॅग्स :Heat Strokeउष्माघातMaharashtraमहाराष्ट्र