शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

“धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:29 IST

SP NCP MP Bajrang Sonawane: कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. फडणवीस, पवार आणि मुंडे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, ते माहिती नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

SP NCP MP Bajrang Sonawane: भगवान गडाचे महाराज या प्रकरणात का बोलले ते मला माहिती नाही. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही. भगवान गड हे सर्व जाती-धर्मांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे भगवान गड एकाच समाजाच्या पाठीशी उभा राहील, असे मला वाटत नाही. धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे, तर तो त्यांचा अधिकार आहे. मला माफ करा, मी त्यांच्या अधिकाऱ्यावर बोलणे योग्य नाही. मला या प्रकरणात महाराजांना आणायचे नाही. त्यांना यावर प्रतिक्रिया का द्यावीशी वाटली हे माहिती नाही. आजपर्यंत कोण्या महाराजांनी एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले नाही. भगवान गडाची उंची खूप मोठी आहे, महाराजांची उंची खूप मोठी आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी महंत नामदेवशास्त्री महाराजांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नामदेवशास्त्रींनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावर बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का

बजरंग सोनावणे म्हणाले की, भगवान गडाचे पावित्र्य मोठे आहे. त्याबाबत नामदेवशास्त्रींनी काय बोलावे, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. आधीपासूनच भगवान गडाचा त्यांना पाठिंबा आहे. धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, हेच मला कळत नाही. त्यांना असे वाटत आहे की, त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचे सरकार हे त्यांच्यापासून बाजूला जायला लागले आहे. यासाठीच ते भगवान गडाकडे आले का, हे माहिती नाही. भगवान गडाने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा अधिकार आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले.

कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचाच

एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावर, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले तर राजीनामा देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतली असे सांगितले. या दोघांच्या विधानावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले. या तीनही विधानांवर भाष्य करताना बजरंग सोनावणे म्हणाले की, मला जेवढे राजकारण कळते किंवा ज्ञान आहे, त्यातून मला एकच वाटते की, कोणत्याही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणे किंवा त्याचा राजीनामा घेण्याचा किंवा तो मंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. मुख्यमंत्री दुसऱ्यांवर बोट का दाखवतात, हे मला माहिती नाही. तिघेही एकमेकांकडे बोट का करत आहेत, यावर मला भाष्य करायचे नाही. 

महंत नामदेवशास्त्री नेमके काय म्हणाले?

भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणbajrang sonwaneबजरंग सोनवणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडे