शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

“धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का”: बजरंग सोनावणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 17:29 IST

SP NCP MP Bajrang Sonawane: कोणत्याही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. फडणवीस, पवार आणि मुंडे एकमेकांकडे बोट दाखवत आहेत, ते माहिती नाही, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे.

SP NCP MP Bajrang Sonawane: भगवान गडाचे महाराज या प्रकरणात का बोलले ते मला माहिती नाही. मला त्यांच्यावर भाष्य करायचे नाही. भगवान गड हे सर्व जाती-धर्मांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे भगवान गड एकाच समाजाच्या पाठीशी उभा राहील, असे मला वाटत नाही. धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे, तर तो त्यांचा अधिकार आहे. मला माफ करा, मी त्यांच्या अधिकाऱ्यावर बोलणे योग्य नाही. मला या प्रकरणात महाराजांना आणायचे नाही. त्यांना यावर प्रतिक्रिया का द्यावीशी वाटली हे माहिती नाही. आजपर्यंत कोण्या महाराजांनी एखाद्या व्यक्तीचे नाव घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले नाही. भगवान गडाची उंची खूप मोठी आहे, महाराजांची उंची खूप मोठी आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी महंत नामदेवशास्त्री महाराजांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली. 

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली असून एकजण अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलने केली आहेत. दुसरीकडे, या प्रकणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर लावून धरली आहे. यावरून दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नामदेवशास्त्रींनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावर बजरंग सोनावणे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले.

धनंजय मुंडेंना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, पक्षावर विश्वास नाही का

बजरंग सोनावणे म्हणाले की, भगवान गडाचे पावित्र्य मोठे आहे. त्याबाबत नामदेवशास्त्रींनी काय बोलावे, हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. आधीपासूनच भगवान गडाचा त्यांना पाठिंबा आहे. धनंजय मुंडे यांना भगवान गडाचा आधार का घ्यावा लागतो, हेच मला कळत नाही. त्यांना असे वाटत आहे की, त्यांचा पक्ष, त्यांचे नेते, त्यांचे सरकार हे त्यांच्यापासून बाजूला जायला लागले आहे. यासाठीच ते भगवान गडाकडे आले का, हे माहिती नाही. भगवान गडाने कोणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा अधिकार आहे, असे बजरंग सोनावणे म्हणाले.

कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री यांचाच

एकीकडे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावर, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितले तर राजीनामा देण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दाखवली. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतली असे सांगितले. या दोघांच्या विधानावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार निर्णय घेतील, असे फडणवीस म्हणाले. या तीनही विधानांवर भाष्य करताना बजरंग सोनावणे म्हणाले की, मला जेवढे राजकारण कळते किंवा ज्ञान आहे, त्यातून मला एकच वाटते की, कोणत्याही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करणे किंवा त्याचा राजीनामा घेण्याचा किंवा तो मंजूर करण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री महोदयांचा आहे. मुख्यमंत्री दुसऱ्यांवर बोट का दाखवतात, हे मला माहिती नाही. तिघेही एकमेकांकडे बोट का करत आहेत, यावर मला भाष्य करायचे नाही. 

महंत नामदेवशास्त्री नेमके काय म्हणाले?

भगवान गड भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. केवळ पाठीशी नाही. यात दोन भाग आहेत. जे गुन्हेगार असतील, त्यांचा शोध सुरू आहे. मला माध्यमांना एक विचारावेसे वाटते की, ज्या लोकांनी हे प्रकरण केले, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली, हे माध्यमांनी का दाखवले नाही. कारण अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे. ती पण दखल घेण्यासारखी आहे, असे मला वाटते. त्यांचा गावातील, बैठकीतील विषय आहे. संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असे मला वाटते. गावचा मुद्दा आहे. आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. त्याच्यावर माध्यमे आक्षेप घेत आहेत. ५३ दिवस झाले मीडिया ट्रायल सुरू आहेत. यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून माणूस किंवा गुन्हेगार नाही. त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवत आहात. त्याची पार्श्वभूमी ही नाही ना, असे सांगत नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणbajrang sonwaneबजरंग सोनवणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसDhananjay Mundeधनंजय मुंडे