शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

आता विधान परिषदेच्या ११ जागांकडे लक्ष

By यदू जोशी | Updated: June 13, 2018 05:34 IST

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे.

 मुंबई : विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात निवडणूक होणार आहे. आपल्या पाच जागा निवडून येण्याच्या दृष्टीने भाजपा रणनीती आखत असून त्यासाठी ‘मित्र’पक्ष शिवसेनेची भाजपाला गरज भासणार आहे.राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडित, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे, भाजपाचे भाई गिरकर आणि विद्यमान मंत्री महादेव जानकर (रासपा), शिवसेनेचे अनिल परब व शेकापचे जयंत पाटील हे ११ सदस्य निवृत्त होत असल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक नागपूर अधिवेशनात होणार असल्याने पावसाळ्यातही नागपुरातील राजकीय वातावरण गरम असेल.एक जागा निवडून आणण्यासाठी २७ आमदारांचा कोटा लागेल. भाजपाचे संख्याबळ १२३ (एक रासपा सदस्यासह) आहे. मात्र विधान परिषदेवर पाच उमेदवार निवडून द्यावयाचे असतील तर भाजपाला आणखी १२ मतांची गरज असेल. त्यात सहा अपक्ष विधानसभा सदस्य हे भाजपासोबत आहेत. त्यामुळे त्यांना आणखी सहा मतांची गरज भासेल.शिवसेनेचे ६३ विधानसभा सदस्य आहेत. त्यांचे दोन आमदार सहज निवडून येऊन त्यांच्याकडे ९ मते शिल्लक असतील. ही मते जर शिवसेनेने भाजपाच्या पारड्यात टाकली तर भाजपाचा पाचवा आमदार निश्चितपणे निवडून येईल. शेकापचे जयंत पाटील यांची नजर शिवसेनेकडील जादा मतांवर असेल. स्वत:च्या पक्षाचे तीन, बहुजन विकास आघाडीचे तीन, माकपा, भारिप-बहुजन महासंघ आणि समाजवादी पार्टीच्या एका विधानसभा सदस्याचे समर्थन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. या शिवाय काही अपक्षांनाही ते गळाशी लावू शकतात.काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४१ मिळून ८३ विधानसभा सदस्य आहेत. दोघांनी आघाडी करून निवडणूक लढली तर त्यांच्या तीन जागा निश्चितपणे येतील. तीन जागा जिंकण्यासाठी त्यांना ८१ आमदार लागतील आणि अशाप्रकारे त्यांच्याकडे दोन मते शिल्लक राहतील. विधानपरिषदेच्या दोन जागा काँग्रेसच्या तर एक राष्ट्रवादीच्या वाट्याला जाईल, असे म्हटले जाते. आघाडीकडे शिल्लक असलेली दोन मते आपल्याला मिळावित असा जयंत पाटील यांचा प्रयत्न असेल.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाPoliticsराजकारण