शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

शहीदांच्या कुटुंबियांना आता २५ लाख, मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 4:09 AM

आपल्या राज्यात शहीदांच्या कुटुंबियांना केवळ साडे आठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

मुंबई : आपल्या राज्यात शहीदांच्या कुटुंबियांना केवळ साडे आठ लाख रुपये दिले जातात. मात्र भविष्यात हा निधी २५ लाख रुपये इतका करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.अथर्व फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब आॅफ इंडियाच्या सभागृहात हा कार्यक्रम पडला़ त्यात सैन्यातील जवानांचा आणि शहीद कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ ही या कार्यक्रमाची संकल्पना होती. फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील राणे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच जवानांचा सन्मान करणारा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, या दोनच दिवशी राष्ट्रभक्ती जागरुक होणे चुकीचे आहे. आपल्या दैनंदिन जगण्यातून देशासमोरील आव्हानांविरोधात दिलेला लढा ही सुद्धा राष्ट्रभक्ती आहे. प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून भ्रष्टाचार, अत्याचार या समस्यांविरोधात संघर्ष करणे ही खरी देशसेवा आहे. या देशसेवेतून खºया अर्थाने आपल्या जवानांसाठी आदरांजली ठरेल.यावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपला देश प्रगतीपथावर असून त्यात सर्वाधिक योगदान सीमेवरलढणाºया जवानांचे आहे. त्यांच्याशिवाय इतिहास घडू शकत नाही. आपणही त्यांच्यासारखे समर्पित होऊन देशसेवा केली पाहिजे. देशासाठी शहीद होणाºया जवानांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही़ 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानMaharashtraमहाराष्ट्र