शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 00:37 IST

कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे...

मला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे. पराभूत होणारा पक्ष ईव्हीएमला दोषी ठरवतो. मात्र हा जनतेचा जनादेश आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे. याच वेळी त्यांनी पंतप्रधानांच्या कामकाजाचीही प्रशंसा केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामनामध्ये इव्हीएमच्या बाबतीत बातमी देण्यात आली आहे की, बांगलादेशमध्ये पुन्हा बॅलेटवर शिफ्ट होण्याचा निर्मय झाला आहे. आपल्याला असं वाटतं का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, "माझा वैयक्तिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार नसते."

पवार म्हणाले, "ईव्हीएममध्ये फेरफार करणे एका व्यक्तीला शक्य नाही कारण ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध झाले, तर संपूर्ण देशात पेटून उठेल. यामुळे, असे करण्याचे धाडस कुणी करेल असे मला तरी वाटत नाही. कधी-कधी काही लोक निवडणूक हरतात, पण आपण हरूच शकत नाही, असे त्यांना वाटते आणि मग ते ईव्हीएमला दोष देऊ लागतात आणि त्यातून सुटका करून घेतात, पण हाच खरा जनतेचा जनादेश आहे."  

पंतप्रधानांच्या डिग्रीवर काय म्हणाले पवार? - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीसंदर्भात आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर विचारले असता अजित पवार म्हणाले, एके काळी केवळ दोन खासदार असलेल्या पक्षाने 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आणि तो सर्वदूरपर्यंत पोहोचला हा मोदींचा करिष्मा आहे की नाही? त्यांच्या विरोधात विविध प्रकारची वक्तव्ये केली जातात. पण ते आणखी लोकप्रिय झाले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत निवडणुका जिंकल्या. आता 9 वर्षांनंतर हे मुद्दे काढून काय उपयोग? त्यांचे कामकाज जनतेने पाहिले आहे आणि राजकीय क्षेत्रात शिक्षणाचा मुद्दा हा तसे पाहिले तर गौन समजला जातो. 

कारण आम्ही पाहिले आहे की या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री झालेले वसंत दादा पाटील यांचेही शिक्षण अतिशय कमी झालेले होते. तरीही अत्यंत उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार म्हणून त्यांची ओळख भारताला होती. त्याच प्रमाणे आपल्या राज्यालाही आहे. त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही. उलट त्यंच्याच कारकिर्दित सर्वात जास्त महाविद्यालये महाविद्यालये उघडण्यात आली. म्हणूनच राजकारणात शिक्षित असण्याची अट नाही. त्यामुळे या प्रकरणी माझी भूमिका स्पष्ट आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना