शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"...हा मोदींचा चमत्कार नाही तर काय आहे?" अजित पवारांनी केली पंतप्रधानांची तारीफ, EVM चंही केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 00:37 IST

कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे...

मला ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. कुणीही एक व्यक्ती ईव्हीएममध्ये गडबड करू शकत नाही. ही एक मोठी यंत्रणा आहे. पराभूत होणारा पक्ष ईव्हीएमला दोषी ठरवतो. मात्र हा जनतेचा जनादेश आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार यांनी निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराचे समर्थन केले आहे. याच वेळी त्यांनी पंतप्रधानांच्या कामकाजाचीही प्रशंसा केली. ते पत्रकारांशी बोलत होते.

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुखपत्र असलेल्या सामनामध्ये इव्हीएमच्या बाबतीत बातमी देण्यात आली आहे की, बांगलादेशमध्ये पुन्हा बॅलेटवर शिफ्ट होण्याचा निर्मय झाला आहे. आपल्याला असं वाटतं का? असे विचारले असता अजित पवार म्हणाले, "माझा वैयक्तिकरित्या ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. ईव्हीएममध्ये बिघाड असता तर छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार नसते."

पवार म्हणाले, "ईव्हीएममध्ये फेरफार करणे एका व्यक्तीला शक्य नाही कारण ही एक मोठी यंत्रणा आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध झाले, तर संपूर्ण देशात पेटून उठेल. यामुळे, असे करण्याचे धाडस कुणी करेल असे मला तरी वाटत नाही. कधी-कधी काही लोक निवडणूक हरतात, पण आपण हरूच शकत नाही, असे त्यांना वाटते आणि मग ते ईव्हीएमला दोष देऊ लागतात आणि त्यातून सुटका करून घेतात, पण हाच खरा जनतेचा जनादेश आहे."  

पंतप्रधानांच्या डिग्रीवर काय म्हणाले पवार? - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीसंदर्भात आणि सावरकरांच्या मुद्द्यांवर विचारले असता अजित पवार म्हणाले, एके काळी केवळ दोन खासदार असलेल्या पक्षाने 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमत मिळवत सरकार स्थापन केले आणि तो सर्वदूरपर्यंत पोहोचला हा मोदींचा करिष्मा आहे की नाही? त्यांच्या विरोधात विविध प्रकारची वक्तव्ये केली जातात. पण ते आणखी लोकप्रिय झाले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपने अनेक राज्यांत निवडणुका जिंकल्या. आता 9 वर्षांनंतर हे मुद्दे काढून काय उपयोग? त्यांचे कामकाज जनतेने पाहिले आहे आणि राजकीय क्षेत्रात शिक्षणाचा मुद्दा हा तसे पाहिले तर गौन समजला जातो. 

कारण आम्ही पाहिले आहे की या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री झालेले वसंत दादा पाटील यांचेही शिक्षण अतिशय कमी झालेले होते. तरीही अत्यंत उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कारभार म्हणून त्यांची ओळख भारताला होती. त्याच प्रमाणे आपल्या राज्यालाही आहे. त्यांची कारकिर्द महाराष्ट्र विसरलेला नाही. उलट त्यंच्याच कारकिर्दित सर्वात जास्त महाविद्यालये महाविद्यालये उघडण्यात आली. म्हणूनच राजकारणात शिक्षित असण्याची अट नाही. त्यामुळे या प्रकरणी माझी भूमिका स्पष्ट आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना