शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Sanjay Raut: मुंबईत जोरदार हालचाली! गैर भाजपा मुख्यमंत्री एकत्र येणार; संजय राऊतांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 20:32 IST

भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत.

देशातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, त्यावर चर्चा करण्यासाठी मुंबईत एक मोठी बैठक होणार आहे. मुंबईमध्ये गैर-भाजपा मुख्यमंत्र्यांना एकत्र आणले जाणार आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याचे संकेत दिले असून तशा हालचाली सुरु झाल्याचे ते म्हणाले. 

भाजपाविरोधात काँग्रेसला बाजुला ठेवून विरोधकांची मोट बांधण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. हे शक्य झाले नाही तर काँग्रेसचे युपीएतील महत्व कमी करून गैर काँग्रेसी नेता युपीएच्या नेतृत्वात येईल यासाठीही प्रयत करत आहेत. यातूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. यामुळे ज्या राज्यांत भाजपा सत्तेत नाही अशा राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. 

यासंबंधात राऊत म्हणाले की, ममता यांनी या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावावर चर्चा केली आहे. यानंतर मुंबईत अशाप्रकारचे संमेलन आयोजित करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. या बैठकीमध्ये बेरोजगारी, महागाई, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, सामाजिक हिंसा निर्माण करण्याचे प्रयत्न आदींवर चर्चा केली जाणार आहे. 

आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन उत्सवांवर कधी तणावाचं वातावरण नव्हतं. पण या वेळेला या देशातल्या काही शक्तीने ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचलं. पण आम्ही त्यांचा डाव उधळून लावला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. काही लोक या दोन्ही दैवतांचा वापर हा राजकीय मुद्यांसाठी करत आहेत. महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करुन राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा