शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Prakash Ambedkar: “माझ्याशी कुणी लग्न करायला तयार नाही, फक्त म्हणतात आमच्याबरोबर फिरा!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:50 IST

उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं, पण युतीबाबत बोलायची त्यांची हिंमत झाली नाही असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

अकोला – राज्यात २०१९ मध्ये एमआयएमसोबत युती करत भारीप बहुजन महासंघानं वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात निवडणुका लढवल्या. यात एमआयएमला फायदा झाला आणि औरंगाबादमध्ये त्यांचा खासदार निवडून आला. परंतु कालांतराने एमआयएमशी दुरावलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी आता नव्या राजकीय मित्राचा शोध सुरू केल्याचं दिसून येते.

अकोल्यात प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी युती संदर्भात एक मोठं वक्त्यव्य केले. ते म्हणाले की, आम्ही शिवसेनेची(Shivsena) युती करण्यात तयार आहोत. त्यासंदर्भात मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी एकदा भेटीसाठी  बोलवलंही होतं. शिवसेनेने भाजपाशी नातं तोडलं आहे तर आम्हाला सोबत घ्यावं. मात्र त्यांची काही हिंमत झाली नाही मला काही बोलायची. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस(Congress) समोरही युतीचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं युती करायची किंवा नाही. आम्ही लग्नाला तयार आहोत मात्र शिवसेना आणि काँग्रेस आमच्या सोबत फिरायला तयार आहेत मात्र लग्नाला कोणीही तयार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत विधान केले होते. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लीम लीग यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीची युती होत असल्याचं त्यांनी जाहीर केले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना या सेक्युलर पक्षासोबत युती करण्यास आमची तयारी असल्याचं आंबेडकर म्हणाले होते.

महापालिका निवडणुकीत होणार का युती?

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. यंदाची महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. कारण भाजपाशी युती तोडल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला आहे. त्यात मुंबई महापालिकेत अद्यापही काँग्रेसनं शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवण्याचं जाहीर केले नाही. त्यामुळे शिवसेना वंचित बहुजन आघाडीला सोबत घेणार का? हे पाहणं गरजेचे आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरcongressकाँग्रेस