शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नथुराम गोडसे यांचे समर्थन कोणीही करू शकत नाही : देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 08:40 IST

मध्य प्रदेशात नथुराम गोडसे यांच्या नावाने कोणी शाळा काढत असेल तर ते चुकीचे आहे...

ठळक मुद्देलोणावळ्यातील भाजप महिला मोर्चा कार्यसमितीचा समारोप

लोणावळा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचे समर्थन या देशात कोणीही करू शकणार नाही. मध्य प्रदेशात त्यांच्या नावाने कोणी शाळा काढत असेल तर ते चुकीचे आहे, असे स्पष्ट मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चा कार्यसमिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करण्यासाठी लोणावळ्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, बर्ड फ्लू हा रोग पाच राज्यांत पसरला असून, महाराष्ट्राच्या काही भागांत याची लागण सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट आले आहे. या व्यावसायिकांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे.

भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या अग्नितांडवावर बोलताना फडणवीस म्हणाले, सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याठिकाणी जाऊन आले; पण कुटुंबांना कोणतीही वाढीव मदत दिली नाही की, कोणावर कारवाईदेखील केली नाही. मागील सरकारने काय केले, केंद्र सरकार काय करतंय हे म्हणत बसण्यापेक्षा संवेदनशीलतेने वागून कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

कार्यसमितीच्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजकारणात महिलांचा वाढता सहभाग पक्ष वाढीसाठी महत्त्वाचा आहे. सध्या महिलांना काम करण्यासाठी मोठी संधी आहे. तसेच, आपले सर्व विरोधक एकत्र आल्याने त्यांची राजकीय स्पेस कमी झाली असून आपली वाढली आहे. त्यामुळे महिला मोर्चा व युवा मोर्चाने सक्रिय व्हावे..

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणNathuram Godseनथुराम गोडसेBJPभाजपा