शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं केलं : मीरा बोरवणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 13:30 IST

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला होता. 

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला होता. पोलिसींग संपलं, महाराष्ट्रानं केरळ, तेलंगणकडून शिकावं, बोरवणकर यांचा सल्ला

काही दिवसांपूर्वीच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक लेटरबॉम्ब टाकला होता. यामध्ये त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रूपये दरमहा जमा करण्यास सांगितले होते असा दावा केला होता. यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं आजवर केलं आहे, असं वक्तव्य माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केलं आहे. 

"माझ्या कारकिर्दीत शंकरराव चव्हाण असेपर्यंत अॅडमिनिस्ट्रेशन खाली गेलं नव्हतं आणि मध्ये सुद्धा प्रामाणिक गृहमंत्री आले आहेत. पण सामान्यपणे कोणताही राजकीय पक्ष असू दे पोलिसांकडून वैयक्तिक किंवा पक्षाचं काम करून घेण्यावरच भर होता. आपले लोक कोणतीही पक्ष असो ती व्यक्ती प्रोफेशनल आहे किंवा नाही यावर न जाता माझा माणूस पदावर आला पाहिजे हा विचार होता. करप्शन, पॉलिटिक पॅट्रेनेच प्रत्येक राजकीय पक्षानं केलं आहे," असंही बोरवणकर म्हणाल्या. त्यांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. 

"काही राजकीय नेत्यांनी येरवडा पोलीस स्टेशनची जी जागा होती त्यावर समिती स्थापन केली होती. आता येरवडा पोलीस स्थानक मध्यावर आलं आहे. त्यावेळी ते एका बाजूला होतं. म्हणजे २ एकर जागा आणि अन्य जमीन हे सोनं होतं. ते काही खासगी लोकांना देण्याचं ठरवलं होतं. त्यावेळी मी ती जागा देणार नसल्याचं म्हटलं. आपण त्या ठिकाणी पोलीस क्वार्टर किंवा पोलीस कार्यालय उभं करू शकतो असा विचार केला होता. कारण एकदा जागा दिली की ती पुन्हा मिळणार नाही. जेव्हा मी ती जागा दिली नाही तेव्हा त्यावेळच्या मंत्र्य़ांनी टीव्हीवर येऊन आम्हाला त्या कमिशनरांचं काहीतरी करावं लागेल असं सांगितलं होतं," असा एक किस्साही त्यांनी सांगितला. असं अनेकदाही झालं की आम्ही सल्ला दिला आणि मंत्र्यांनी कामही केलं. असे दोन्ही अनुभव आम्हाला आले असंही त्या म्हणाल्या. पोलीस दलात जात आणि विचारधारेवर आधारीत पोलीस अधिकारी आहेत. ते त्याप्रमाणेच वागत आहेत. तेदेखील बदलण्याची आवश्यकता असल्याचं बोरवणकर यांनी सांगितलं.  एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दलाचं नाव खराब करू नयेकाही पोलीस किंवा अधिकारी चुकीचं काम करतात म्हणून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस चुकीचं काम करतात असा समज चुकीचा आहे. काही दिवसांपूर्वीच बाहेरच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आम्ही तर मुंबई पोलिसांना स्कॉटलंड पोलीस म्हणून पाहायचो पण तुमचे हे हाल झाले. हे ऐकून दु:ख झालं. एका अधिकाऱ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीसांचं नाव खराब करू नये, असंही सचिन वझेंच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या. आपल्याला ज्यातून बाहेर पडायचं आहे त्यावर आपण दोष देत न बसता त्यावरील उपाय शोधले पाहिजेत, असंही त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझेParam Bir Singhपरम बीर सिंग