शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गड-किल्ल्यांवरील दारूबंदी ही तर निव्वळ धूळफेक; भाजपा आमदाराचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 6:27 PM

गृह खात्याने कोणतीही नवी नियमावली तयार केली नसल्याचा दावा

मुंबई: राज्यातील पवित्र गड-किल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांवर आळा बसावा व आपल्या इतिहासाचे पावित्र्य राखले जावे याकरिता राज्याच्या गृह खात्यांकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले, परंतु अशी कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आलेली नसून ही निव्वळ धूळफेक असल्याचा गंभीर आरोप कांदिवली पूर्व विधानसभेचे आमंदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

गड-किल्ल्यांवर चालणाऱ्या दारू पार्टी, तेथे घातला जाणारा गोंधळ आणि त्यातून दूषित केले जाणारे इतिहासाचे पावित्र्य यांवर आळा घालण्याची मागणी अनेक इतिहासप्रेमी करत होते. यासंदर्भात नवीन नियमावली तयार करून अशा दारू पिणाऱ्यांवर सहा महिन्यांची शिक्षा व १० हजार रुपये आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले होते. परंतु गृह खात्यांकडून कोणतीही नवीन नियमावली तयार करण्यात आली नसून केवळ विद्यमान नियमावलीचे परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

राज्यात लागू असलेल्या महाराष्ट्र दारूबंदी कायदा-१९४९ नुसार परवानगी असलेल्या जागा वगळता इतर कोणत्याही ठिकाणी दारूच्या नशेत गोंधळ घालणाऱ्यांवर शिक्षेची तरतूद आहे. परंतु यात कुठेही सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यावर बंदी असल्याचा उल्लेख नाही. मुळात गड-किल्ले हे सार्वजनिक ठिकाण आहेत. त्यामुळे तेथे दारू पिण्यास मनाई करायची असेल तर मूळ कायद्यात बदल करणे आवश्यक होते. मात्र अशी कोणतीही कार्यवाही न करता केवळ प्रसिद्धीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांमध्ये खोटी माहिती दिली. या संदर्भात मूळ कायद्यात बदल करण्याची गरज लक्षात घेऊन आगामी अधिवेशनात अशासकीय विधेयकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी घालण्याची मागणी करणार असल्याचे आमदार भातखळकर यांनी सांगितले.

शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे ‘तिघाडी सरकार’ मुळातच जनतेला फसवून सत्तेत आले आहे. एकीकडे मुंबईमध्ये रात्रभर दारू पिण्याची मुभा देऊन दुसरीकडे आम्ही गड-किल्ल्यांवर दारूबंदी करीत असल्याचे खोटे विधान हे सरकार करत आहे. यातून जनतेला फसविणे हीच यांची नियत आहे हे स्पष्ट होते. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून जनतेची फसवणूक थांबवून मूळ कायद्यात बदल करावा अशी मागणी मी केली आहे” असे भातखळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :FortगडAtul Bhatkalkarअतुल भातखळकरAnil Deshmukhअनिल देशमुख