शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Nitin Gadkari: "लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही, त्याने समाज..."; गडकरींचा विरोध का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:24 IST

Nitin Gadkari on Live in Relationship: केंद्रीय नितीन गडकरी यांनी लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही, असे म्हणत केंद्रीय नितीन गडकरी यांनी या नातेसंबंधांना विरोध केला. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचा ब्रिटन दौऱ्यातील अनुभवही नितीन गडकरी यांनी सांगितला. एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केले. 

मुलाखतीत नितीन गडकरी यांना लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल तुमचं मत काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, "लिव्ह इन रिलेशनशिप चुकीचं आहे. मी लंडनला गेलो होतो ब्रिटिनच्या संसदेत. पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांना भेटलो. त्यांनी मला विचारलं की, तुमच्या देशात सर्वात मोठी समस्या कोणती आहे?"

युरोपियन देशात ही समस्या झालीये -नितीन गडकरी

"मी त्यांना सांगितलं की, गरीब, भूकबळी, बेरोजगारी. तुमच्या देशात कोणती समस्या आहे? ते म्हणाले, 'आमची सगळ्यात मोठी समस्या ही आहे, युरोपियन देशांची की, बहुसंख्य तरुण आणि तरुणी लग्न करत नाहीये. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्याचा परिणाम असा होतोय की, त्यांची मुलं कशी होतील, त्यांचं भविष्य काय असेल?", असा प्रश्न नितीन गडकरींनी उपस्थित केला.  

"तुम्ही सामाजिक जीवन पद्धती उद्ध्वस्त केली, तर कसं होईल. मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची जबाबदारी आईवडिलांची असते. कुणी उद्या म्हणेल की आम्ही आमच्या आनंदासाठी मुलं जन्माला घातली आणि त्यांचं ते बघतील, असं नाही चालणार", असे गडकरी म्हणाले. 

...तर उद्या दोन पत्नी करण्याची परवानगी द्यावी लागेल -गडकरी

"भारतात घटस्फोटांवर बंदी यायला हवी का? असा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अजिबात नाही. पण, लिव्ह इन रिलेशनशिप योग्य नाही. त्याने समाज नष्ट होईल. हा समाज का टिकलेला आहे? कारण स्त्री पुरूष प्रमाण व्यवस्थित आहे. उद्या स्त्रियांची संख्या वाढली आणि त्या प्रमाणात पुरुषांची कमी झाली, तर उद्या तुम्हाला दोन पत्नी विवाह करण्याची परवानगी द्यावी लागेल", अशी भूमिका नितीन गडकरींनी मांडली.  

"सामाजिक व्यवस्था चालवण्याचा नियम असतात. त्यांचं पालन केलं गेलं पाहिजे. मी एकदा अधिवेशनासाठी जातो होतो. वरच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने आणि मुलीने जे करायचं नाही, ते करणं सुरू केलं. आमचे सर म्हणाले की, हे चांगलं नाही. हे करू नका. तर मुलगा म्हणाला की, आम्हाला जे वाटेल ते करू. आम्हाला अधिकार आहे. तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? त्यावर सर म्हणाले की, आम्ही सांगणारे कोणी नाही पण आम्हालाही भावना आहेत. आजकाल तर तृतीयपंथीयांचेही लग्न होत आहे. मुलीचं-मुलीशी, मुलाचं मुलाशी लग्न होत आहेत. पण, समाज याने नष्ट होईल", असे मत नितीन गडकरी यांनी मांडले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ