शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:54 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Nitin Gadkari Statement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन विरोधकांना टीका करण्यासोबतच सरकारवरही भाष्य करतात. आता नागपुरातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी सरकारला 'विषकन्या' म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

गडकरी म्हणाले की, 'आजच नाही, तर मी विरोधी पक्षनेता असतानाही एक गोष्ट ठामपणे सांगायचो. लोकांचा देवावर आणि सरकारवर विश्वास आहे. पण सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्ध्वस्त होऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची सावलीही प्रकल्पाला उद्ध्वस्त करू शकते. सरकार विषकन्येसारखे आहे. जे सरकारपासून दूर राहतात त्याची प्रगती होते,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी काय म्हणाले गडकरी?कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, 'सरकारच्याही अनेक अडचणी आहेत. देशाचे कृषी उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी 1500 होईल. आज हे सर्वात मोठे ध्येय आपल्यासमोर आहे. सरकारमधील अडचणी वेगळ्या आहेत. या वर्षी एमएसपी देताना अडचणी आल्यात. बाजारभाव आणि एमएसपी यांच्यात समतोल साधण्यासाठी बाजारभाव कमी आणि एमएसपी जास्त आहे. सरकारला दीड लाख कोटी रुपये द्यावे लागतील आणि घेतलेले धान्य ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. किती गडबड झाली देव जाणे, मंत्री असल्याने मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत,' असंही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाGovernmentसरकारnagpurनागपूर