शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सरकार विषकन्येसारखे, सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्धवस्त होऊ शकतात- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 17:54 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

Nitin Gadkari Statement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेकदा ते सार्वजनिक मंचावरुन विरोधकांना टीका करण्यासोबतच सरकारवरही भाष्य करतात. आता नागपुरातील एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी सरकारला 'विषकन्या' म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे.

गडकरी म्हणाले की, 'आजच नाही, तर मी विरोधी पक्षनेता असतानाही एक गोष्ट ठामपणे सांगायचो. लोकांचा देवावर आणि सरकारवर विश्वास आहे. पण सरकारी हस्तक्षेपामुळे प्रकल्प उद्ध्वस्त होऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप किंवा सरकारची सावलीही प्रकल्पाला उद्ध्वस्त करू शकते. सरकार विषकन्येसारखे आहे. जे सरकारपासून दूर राहतात त्याची प्रगती होते,' असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी काय म्हणाले गडकरी?कृषी विकास प्रतिष्ठानच्या वतीने नागपुरात आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, 'सरकारच्याही अनेक अडचणी आहेत. देशाचे कृषी उत्पन्न 22 टक्क्यांनी वाढवायचे आहे आणि ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी शेतकऱ्यांची मजुरी 1500 होईल. आज हे सर्वात मोठे ध्येय आपल्यासमोर आहे. सरकारमधील अडचणी वेगळ्या आहेत. या वर्षी एमएसपी देताना अडचणी आल्यात. बाजारभाव आणि एमएसपी यांच्यात समतोल साधण्यासाठी बाजारभाव कमी आणि एमएसपी जास्त आहे. सरकारला दीड लाख कोटी रुपये द्यावे लागतील आणि घेतलेले धान्य ठेवण्यासाठी गोदाम नाहीत. किती गडबड झाली देव जाणे, मंत्री असल्याने मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत,' असंही गडकरी म्हणाले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाGovernmentसरकारnagpurनागपूर