शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नीरव मोदीच्या जमिनीवर कर्जतमधील शेतकऱ्यांनी केला कब्जा, ट्रॅक्टरने जमीन नांगरली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 5:01 PM

देशाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे.

अहमदनगर- देशाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरे व्यापारी नीरव मोदीला अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दणका दिला आहे.  नीरव मोदीच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळामधील 125 एकर जमीनीवर स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी कब्जा केला. तसंच ट्रॅक्टर आणि बैलजोड्या आणून शेतकऱ्यांनी जमीन नांगरली. उद्यापासून या जागेत शेती करणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हंटलं आहे. 

 

काळी आई मुक्ती संग्रामचा नारा देत घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी जमिनीवर कब्जा केला. अत्यंत कवडीमोल भावानं शेती घेतल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला उपस्थित होत्या. 

 

नीरव मोदीने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झाल्यावर ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त केली. यावेळी ईडीनं त्याच्या खंडाळ्याची जमीन सील केली. तेव्हापासून या जमिनीवर ईडीचा ताबा आहे. मात्र अजूनही इथला ऊर्जा प्रकल्प सुरुच आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही. तोपर्यंत या जमीनीवर अंमलबजावणी संचालनालयाची कब्जा राहणार आहे.

दरम्यान, नीरव मोदी याने ही जमीन थेट न घेता मध्यस्थीच्या माध्यमातून खरेदी केली आहे. जमिनीवरील आमचा मालकी हक्क दाखविण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं आहे. नीरव मोदीसारख्या लोकांना बँकांकडून करोडो रूपये दिले जातात व शेतकऱ्यांना साधे 10 हजार रूपयेही दिले जात नाहीत. म्हणूनच आम्ही भूमी आंदोलन सुरू केलं आहे, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली आहे.  

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदी