शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Mumbai Metro Car Shed: कांजुरमार्ग मेट्रो कारशेडमुळे १,५८० कोटी वाचणार; समितीने दिला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 14:14 IST

मुंबई तीन मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. कांजुरमार्ग (kanjurmarg mumbai metro car shed) येथील जागेत मेट्रो कारशेड बांधल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे एक हजार ५८० कोटी रुपये वाचतील, असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

ठळक मुद्देकांजुरमार्गची जागा आरेपेक्षा मोठीजागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये सरकारचे पैसे वाचतीलनऊ सदस्यीय समितीने सादर केला अहवाल

मुंबई :मुंबईमेट्रो तीनच्या कारशेडवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. मेट्रो तीनचा कार डेपो आरे येथे उभारायचा की कांजुरमार्गमध्ये, यावरून वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कांजुरमार्ग येथे मेट्रो कारशेड उभारल्यास राज्याचे तब्बल एक हजार ५८० कोटी रुपये वाचतील, असा अहवाल समितीने दिला आहे. (nine member committee report says that kanjurmarg metro car shed to be save 1580 crore rupees)

मुंबई तीन मेट्रो कारशेड उभारण्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत नऊ सदस्यांचा समावेश करण्यात आला होता. कांजुरमार्ग (kanjurmarg mumbai metro car shed) येथील जागेत मेट्रो कारशेड बांधल्यास जागेची किंमत आणि बांधकाम खर्च यामध्ये राज्याचे एक हजार ५८० कोटी रुपये वाचतील, असे या समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल"

कांजुरमार्ग येथील जागा आरे (Aarey Metro Carshed) येथील जागेपेक्षा मोठी आहे. आरे कारशेडमध्ये केवळ ३० मेट्रो उभ्या राहू शकतात. याउलट, कांजुरमार्ग येथील जागेत ५५ मेट्रो उभ्या राहू शकतात, असेही या समितीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सांगितले आहे. 

दरम्यान, मेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत आहे. यातून मेट्रो प्रकल्प रखडेल आणि राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान होईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांची मोठी दिशाभूल होत आहे, असे पत्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते. हा अट्टहास पूर्ण करण्यासाठी खासगी विकासकांना मोठे आर्थिक लाभ देण्यासाठी सुद्धा हालचाली होत आहे. हा प्रकार उघडकीस येईल, तेव्हा मुख्यमंत्र्यांवरही संगनमताचा आरोप होईल, असा इशारा फडणवीस यांनी या पत्रात दिला आहे.

तत्पूर्वी, कांजुरमार्ग येथील जागा मिठागराची असल्यामुळे त्यावर केंद्राचा अधिकार आहे, असे सांगत त्यावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा फलक केंद्र सरकारकडून लावण्यात आला होता. एमएमआरडीएने मेट्रो कारशेडसाठी सुरू केलेल खोदकाम तात्काळ थांबवावे, अशी नोटीस महेशकुमार गरोडीया यांनी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांना पाठवली आहे. केंद्र सरकारने करार रद्द करण्याच्या निर्णयाला सन २००५ मध्ये उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, उच्च न्यायालयाने गरोडिया यांना तूर्तास दिलासा देत 'त्या' जमिनी संदर्भात अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांचा दावा कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे.

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईAarey ColoneyआरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे