शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
2
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
3
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
4
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
5
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
6
अचानक बेपत्ता झाली होती बॉलिवूड अभिनेत्री; ११ महिन्यांनी सापडला हाडांचा सांगाडा
7
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
8
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
9
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
10
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
11
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
12
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
13
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
14
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
15
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
16
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
17
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
18
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
19
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
20
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

पुढच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसाच होईल – जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 4:30 PM

या देशातील आर्थिक,सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडयाखाली गेली अनेक वर्ष वाढवलेली आहे.

मुंबई :  या देशातील आर्थिक,सामाजिक क्षेत्रात प्रगती करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंडयाखाली गेली अनेक वर्ष वाढवलेली आहे. शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ज्या उद्देशाने पक्षाची स्थापना करुन देशाची आणि राज्याची प्रगती करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं पुढचं पाऊल टाकण्याची ताकद स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी येवो आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाचा हा दिवस आपल्या सर्वांना शुभेच्छा देवून आणि आज पक्षातील उत्साह बघून पुढच्या स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी लाल किल्ल्यावरुन होणारं भाषण तुमच्या-माझ्या मनातील माणसंच होईल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

देशाचा ७२ वा स्वातंत्र्यदिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेली अनेक वर्ष या देशात प्रगतीचा विचार आपण करत होतो. परंतु गेल्या चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रगतीविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होवू लागली आहे. सकाळी उठल्यानंतर वर्तमानपत्रात पाहिल्यानंतर या देशात आतापर्यंत आम्ही जी प्रगती साधली तो प्रगतीसाठीचा जो प्रयत्न होता त्या प्रयत्नाचं पुढचं पाऊल पडेल असा विश्वास वाटत होता. परंतु आज वर्तमानपत्र उघडल्यानंतर या देशातील एखादया बॅंकेतील पैसेच आपोआपच दुसऱ्या बॅंकेत निघून जातात. या देशातील निवडणूका एका दिवसात घेण्याचा प्रयत्न सुरु असताना त्याही शक्यता बदलून वेगवेगळे घटक शंका व्यक्त करतात. या देशातील व्यवस्था भविष्यकाळाकडे बघत असताना या देशातील रुपयादेखील ७० रुपयाच्या वर जायला लागतो हे पाहायला मिळत आहे असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

या देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं त्या उन्नतीचा फायदा या देशातील तळागाळातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला झाला पाहिजे ही महात्मा गांधीजींची स्वातंत्र्य मिळवतानाची कल्पना होती. ती आपण जवळपास ६० वर्ष सांभाळण्याचा प्रयत्न केला. म्हणून मागील तीन-चार वर्षात सर्व जातीधर्मांना एकत्र घेवून जाणारा भारत पुन्हा एकदा मागे वळतोय की काय अशी शंका या देशातील लोकांच्या मनात निर्माण झाली आहे अशी भीतीही आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली.

साडेतीन वर्षात या देशातील जनतेने विश्वासाने हात दिला त्याबद्दल आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतातील माणूस कधीही नाऊमेद झाला नाही अशी अनेक संकटे या देशातील जनतेने झेलली आहेत. मनात नसताना व्यवस्था दूर करण्यासाठी भारतीय लोकशाहीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओतलेला जो प्राण आहे त्याचा सतत आपणाला सगळयांना उपयोग झालेला आहे. या देशाची लोकशाही एवढी बळकट आहे की, सामान्य माणसं एवढी सामान्यपणे विचार करत जगत असतील तरी एवढा दुरगामी विचार करतात की, देशाच्या प्रगतीतील कोणताही अडथळा दुर करण्याचा सतत प्रयत्न जनतेने केला आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

भारतातील जनता या देशाला अधिक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करणारी आहे आणि म्हणून आजच्या स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी सामान्य माणसाच्या मनातील भारत तयार करण्याचा प्रयत्न आणि ताकद आपल्यामध्ये येवो अशा शुभेच्छा जयंत पाटील यांनी जनतेला दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रथमच स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा सर्वांना दिल्या.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार विदया चव्हाण, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर, राष्ट्रवादीच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवादलाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारIndependence Dayस्वातंत्र्य दिवसMaharashtraमहाराष्ट्र