शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:12 IST

Marathwada News: मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. मध्य गोदावरी खोऱ्यातील १९.२९ आणि पैनगंगा खोऱ्यातून ४४.५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल मराठवाडा अभियंता मित्रमंडळातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण आदींची उपस्थिती होती.     जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, मध्य गोदावरी खोरे आणि पैनगंगा खोऱ्यातील पाणी मिळाले आहे. त्यासाठी ५ ते ७ वर्षांत बरेचसे प्रकल्प पूर्ण होऊन मराठवाड्याला शाश्वत पाणी मिळेल. १९.२९ टीएमसी वापरामुळे मराठवाड्यातील धारूर, परळी, पालम, पूर्णा, कंधार, लोहा, भोकर, औंढा, वसमत तालुक्यात नवीन प्रकल्प बांधता येतील. नांदेड जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० प्रकल्पांना आजच मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात येईल. ४४.५४ टीएमसीतून हिंगोली, औंढा, कळमनुरी, हिमायतनगर, माहूर, यवतमाळ परिसराला फायदा होईल. एक हजार अभियंत्यांची कमतरता आहे. मात्र, लवकरच भरतीचा मार्ग मोकळा होईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

दमणगंगेचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू सह्याद्रीच्या माथ्यावरून पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातून ११५ टीएमसी पाणी, कोकणातून पाणी आणू शकतो. त्यासाठी अंदाजपत्रक, नव्याने सर्व्हेक्षणाची गरज आहे. नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदीच्या उपखोऱ्यांत ३७० अब्ज घनफूट पाणी शिल्लक आहे. ११५ अब्ज घनफूट पाणी वळू शकते. ७.५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDamधरणMarathwadaमराठवाडा