शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मराठवाड्यात नव्याने धरणे बांधावी लागतील, जयंत पाटील यांचे सुतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 09:12 IST

Marathwada News: मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. मध्य गोदावरी खोऱ्यातील १९.२९ आणि पैनगंगा खोऱ्यातून ४४.५४ टीएमसी पाणी मराठवाड्यात वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल मराठवाडा अभियंता मित्रमंडळातर्फे आयोजित सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. सतीश चव्हाण आदींची उपस्थिती होती.     जलसंपदामंत्री पाटील म्हणाले, मध्य गोदावरी खोरे आणि पैनगंगा खोऱ्यातील पाणी मिळाले आहे. त्यासाठी ५ ते ७ वर्षांत बरेचसे प्रकल्प पूर्ण होऊन मराठवाड्याला शाश्वत पाणी मिळेल. १९.२९ टीएमसी वापरामुळे मराठवाड्यातील धारूर, परळी, पालम, पूर्णा, कंधार, लोहा, भोकर, औंढा, वसमत तालुक्यात नवीन प्रकल्प बांधता येतील. नांदेड जिल्ह्यातील लहान-मोठ्या ४० प्रकल्पांना आजच मंजुरी दिली आहे. बीड जिल्ह्यातील प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात येईल. ४४.५४ टीएमसीतून हिंगोली, औंढा, कळमनुरी, हिमायतनगर, माहूर, यवतमाळ परिसराला फायदा होईल. एक हजार अभियंत्यांची कमतरता आहे. मात्र, लवकरच भरतीचा मार्ग मोकळा होईल, असेही पाटील यांनी सांगितले. 

दमणगंगेचे पाणी वळविण्यासाठी प्रयत्न सुरू सह्याद्रीच्या माथ्यावरून पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातून ११५ टीएमसी पाणी, कोकणातून पाणी आणू शकतो. त्यासाठी अंदाजपत्रक, नव्याने सर्व्हेक्षणाची गरज आहे. नार-पार, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नदीच्या उपखोऱ्यांत ३७० अब्ज घनफूट पाणी शिल्लक आहे. ११५ अब्ज घनफूट पाणी वळू शकते. ७.५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात आले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलDamधरणMarathwadaमराठवाडा